सर्वाधिक 9 गाडय़ा गुहागरात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शुक्रवारी ठाणे, स्वारगेट, चिंचवड येथून एस. टी. महामंडळाच्या 21 बसेस रत्नागिरी जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. चाकरमान्यांसाठी एसटी बस सोडण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर शुक्रवारी प्रथमच चाकरमानी एसटीने दाखल झाले. यात सर्वाधिक 9 गाडय़ा गुहागर तालुक्यात आल्या. शनिवारी वीसहून अधिक गाडय़ा चाकरमान्यांना घेऊन जिल्हय़ात येण्याची शक्यता आहे.
बुधवारपासून कोकणात एसटीगाडय़ा दाखल होण्याची शक्यता होती. मात्र मुंबईसह कोकणात कोसळणाऱया मुसळधार पावसाने या गाडय़ा सुटल्या नव्हत्या. गुरूवारी सायंकाळनंतर चाकरमान्यांना घेऊन कोकणच्या दिशेने गाडय़ा रवाना झाल्या व चाकरमान्यांचा कोकणात येण्याचा मार्ग खऱया अर्थाने खुला झाला.
शुक्रवारी एकूण 21 बसेस जिल्हय़ात दाखल झाल्याची माहिती रत्नागिरी एस.टी विभागाकडून देण्यात आली. यामध्ये गुहागरमध्ये सर्वाधिक 9 गाडय़ा दाखल झाल्या आहेत. शनिवारी आणखी काही गाडय़ांचे बुकींगही झाले असून चाकरमान्यांच्या संख्येनुसार बसेस सोडले जाणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हय़ात तालुकानिहाय दाखल झालेल्या गाडय़ा
तालुका संख्या
दापोली 4
खेड 2
चिपळूण 8
गुहागर 9
देवरूख 2
रत्नागिरी 3
लांजा 1
एकूण 21