बेंगळूर : ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे चामराजनगर जिल्हा इस्पितळातील 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे एकूण 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एकाच रात्री मृत्यू झालेल्या 13 रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची तर नंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रु. मदत द्यावी, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे. सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतर अतिरिक्त मदत देण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे चामराजनगर जिल्हा इस्पितळातील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरितपणे तक्रार नोंदवून घेतली होती.
Previous Articleबदामीतूनच आगामी निवडणूक लढवणार : सिद्धरामय्या
Next Article दहावी परीक्षा रद्द करण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.