जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेण्याची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
जिह्यातील पाणी समस्या तसेच जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज यावषीही निर्माण होण्याची शक्मयता आहे. सध्या ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानंतर जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यावषी बहुसंख्य तालुक्मयामध्ये चाऱयाचे प्रमाण बऱयापैकी आहे. असे असले तरी काही तालुक्मयांमध्ये चाऱयाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून जिल्हा प्रशासनाने आतापासून जनावरांच्या चाऱयाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरवषी जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना प्रशासन मात्र उशीराने याकडे लक्ष देत आहे. काही तालुक्मयांमध्ये मोजक्मयाच चारा छावण्या सुरू करत असल्याचा आरोप शेतकऱयांतून होत आहे. अनेक तालुक्मयांमध्ये चाऱयाचा प्रश्न उद्भवत आहे. मे, जून महिन्यामध्ये अधिक चारा टंचाई भासत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वळीव पाऊस लवकर होत आहे. त्यानंतर अचानक पुराचा फटका बसत आहे. यामुळे चाऱयाचे मोठे नुकसान होत आहे. तेव्हा चारा छावणी तसेच जनावरांसाठी गो-शाळा निर्माण करणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळय़ानंतर पुराचा फटका बसून मोठे नुकसान होत आहे. पुरामुळे ओला दुष्काळ निर्माण होत आहे. तो दुष्काळ निवारण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्या दृष्टिने पाऊल उचलले जात नाही. याचा विचार गांभीर्याने करून वेळेत गो-शाळा आणि चारा छावण्या उभे करणे गरजेचे आहे. उन्हाळय़ामध्ये अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी व जनवरांच्या चाऱयाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. दुधाला योग्य भाव मिळत नाही, कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱयांना जनावरे ही केवळ चाऱयावरच पाळण्याची वेळ आली आहे.
चाऱयाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
तेव्हा शेतकऱयांना खरेदी केलेल्या दरापेक्षा 50 टक्के दर कमी करून चारा विक्री करून देण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने आतापासूनच यासाठी तयारी करणे महत्त्वाचे आहे. कारण गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता चाऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.