प्रतिनिधी / महाबळेश्वर
वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणी टंचाई आज चौथ्या दिवशी संपुष्टात आली चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर महाबळेश्वर व पांचगणी येथे वीज व पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.
तौक्ते चक्रि वादळाचा महाबळेश्वर तालुक्याला मोठा फटका बसला होता वादळा मुळे वीज वितरण कंपनीचे कंबरडेच मोडले होते अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडले होते तर वीजेच्या तारा देखिल अनेक ठिकाणी तुटल्या होत्या या मुळे वीज पुरवठया मध्ये मोठा अडथळा निर्माण झाला होता शनिवार पासुन शहराचा वीज पुरवठा बंद पडला होता गेली चार दिवस वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न वीज वितरण विभागा कडुन करण्यात येत होते परंतु एका मागुन एक अडचणी येत गेल्याने गेली चार दिवस महाबळेश्वर व पांचगणी येथील वीज पुरवठा खंडीत झाला होता.
महाबळेश्वर व पांचगणी शहरास जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविले जाते वीज पुरवठा खंडीत झाल्याने या दोन्ही शहराचा पाणी पुरवठा बंद पडला होता वीज पुरवठा एक दोन दिवसात सुरू होईल या अपेक्षेने प्राधिकरणाने पाणी पुरविण्यासाठी काही प्रयत्न केले नाही नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शहरातील कृत्रिम पाणी टंचाईची साधी दखल देखिल न घेतल्याने शहरातील नागरीकांतुन तीव्र संताप व्यक्त केला जात होता दरम्यान पाणी टंचाई मुळे शहरातील नागरीकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली तीन दिवसांच्या प्रतिक्षे नंतर पालिकेच्या सिंघम मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला एकीकडे त्यांनी नागरीकांना आवश्यक्ते नुसार पाण्याचे टॅंकर पुरविण्यास प्रारंभ केला पालिकेच्या टॅंकर बरोबर खाजगी टॅंकरही देखिल त्यांनी भाडयाने घेवुन पाणी दरम्यान शहराचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार व नगरसेवक संदीप साळुंखे प्रकाश पाटील संजय पिसाळ विशाला तोष्णीवाल अॅड संजय जंगम यांनी मुख्याधिकारी यांचेशी संपर्क साधला कोणत्याही स्थितीत शहरातील नागरीकांना पाणी पुरविले पाहीजे वीज नसली तरी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
यावर उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी भर दिला त्या वेळी आपण जनरेटर मागविले असुन मंगळवारी सायंकाळी जनरेटर हे शहरात दाखल होतील असे स्पष्ट केल ठरल्या प्रमाणे मंगळवारी सायंकाळी जनरेटन आले त्या पैकी एक जनरेटर ग्लॅनोगल धरणावर पाठविण्यात आला व तो सुरू करून धरणातुन पाणी उपसा सुरू करण्यात आला या वेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील उपनगराध्यक्ष अफजल सुतार नगरसेवक संदीप साळंुखे प्रकाश पाटील संजय पिसाळ विशाल तोष्णीवाल अॅड संजय जंगम आदी मान्यवरांसह समाज सेवक क तौफिक पटवेकर उपस्थित होते.
मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना उपनगराध्यक्ष अफजल सुतार व इतर नगरसेवकांनी सहकार्य केल्याने बुधवार पासुन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाला दरम्यान शहरात मंगळवारी रात्री वीज पुरवठा देखील सुरू झाला अशा प्रकारे चार दिवसांच्या प्रतिक्षे नंतर शहराचा वीज व पाणी पुरवठा सुरळीत झाला.