प्रतिनिधी/ वडूज
मायणी (ता.खटाव) परिसराचा शेती पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील तत्कालीन भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांकडे शासनस्तरावर पाठपुरावा केला.
मागील वर्षी मायणी येथे तत्कालीन पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, पशुधन विकास मंत्री महादेव जानकर या चार मंत्र्यांच्या दौयामुळेच तारळी योजनेस ख्रया अर्थाने चालना मिळाली असे मत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केले.
तारळी योजनेचे पाणी मायणी (ता.खटाव) येथील पडळकर तलाव व माळीनगर तलाव व खडकाचा मळा तलाव येथे पोहोचलेल्या पाण्याचे पूजन महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. येळगावकर यांनी ही माहिती दिली. यावेळी युवानेते सचिन गुदगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, डॉ. सौ.उर्मिला येळगावकर, उपसरपंच आनंदराव शेवाळे, महादेव ढवळे,नितीन पडळकर ,अभिजित काबुगडे, मानसी तोरो, रेणू येळगावकर, सौ.चन्ने, सिता कचरे, आदी उपस्थित होते.
डॉ. येळगावकर म्हणाले, मंत्र्यांच्या दौयावेळी धोंडेवाडी उड्डाणपूलाचे काम बंद होते. यासंदर्भात आपण मंत्री महोदयांना कल्पना दिली तसेच हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनीही तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून चांगला पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच निर्णायकक्षणी वडूज, मायणी येथील पत्रकारांनी तारळी योजनेत प्रत्यक्ष पाणी येण्यासाठी ठोस पाठपुरावा केला.
सचिन गुदगे म्हणाले, मायणी परिसराला उरमोडी, तारळीचे पाणी मिळावे ही स्व. भाऊसाहेब गुदगेंची तळमळ होती. डॉ. येळगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली. ही आपल्यादृष्टीने समाधानाची बाजू आहे. राजू कचरे यांनी सूत्रसंचालन केले. मोहन दगडे यांनी आभार मानले.