बेंगळूर : कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मार्च महिन्यांपासून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन सुरू आहे. असे असताना विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती शिक्षणतज्ञांनी व्यक्त केली असून विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय शिक्षणाचा अनुभव घेता यावा यासाठी लवकरात लवकर शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. कर्नाटक सरकारने नियुक्त केलेल्या शिक्षणतज्ञांच्या समितीने पालकांद्वारे मिळणाऱया सूचनांच्याआधारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्याकडे लक्ष दिले आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने दूरदर्शनद्वारे शैक्षणिक वर्ग सुरू केले आहेत.
Previous Articleपंजाब : आता खाजगी रुग्णालयांना मिळणार सरकारकडून प्लाझ्मा; पण…
Next Article लालू प्रसाद यादव यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह