प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात 4 महिन्यानंतर नव्याने आढळणाऱया रूग्णांची संख्या शंभरीच्या आत आली आह़े शुक्रवारी जिह्यात नव्याने 91 रूग्ण आढळून आले आहेत़ तर 5 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यापूर्वी 4 एप्रिल रोजी कोरोनाचे 60 रूग्ण आढळून आले होत़े त्यानंतर रूग्णसंख्येचा आलेख शभंरीच्या वर राहिला होत़ा रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आह़े
जिह्यामध्ये कोरोनाचा चाचण्यांची कमी होणारी संख्या देखील चिंतेचा विषय ठरत आह़े चाचणी करण्यासाठी लोक पुढे येत नसल्याने पुन्हा एकदा जिह्यात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कोरोनाच्या 3 हजार 304 चाचण्या करण्यात आल्य़ा आरटीपीसीआरच्या 2 हजार 120 चाचण्यांपैकी 59 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 184 पैकी 32 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, यामध्ये मंडणगड-1, दापोली-5, खेड-11, गुहागर-2, चिपळूण-23, संगमेश्वर-16, रत्नागिरी-29, लांजा-1 तर राजापूर-3 असे रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 74 हजार 765 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.78 इतका आह़े तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये खेड-2, रत्नागिरी-2 लांजा-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 100 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 70 हजार 865 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 94.78 इतके आह़े तर 1 हजार 598 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 305 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़