वाळपई प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या गोळवली सत्तरी येथील वाघाच्या मृत्यु संदर्भात संशयितांना अटक करण्यात आले पर्यंत नखाचा शोध घेण्यासाठी नखात्याने नियुक्त केलेले तपास यंत्रणेचे अधिकारी नंदकुमार परब व त्यांना सहकार्य करणारे विलास गावस त्यांनी ज्या पद्धतीने या संदर्भात तपास केल्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱयांच्या एकूण त्यांच्या कर्तबगारीवर चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
5 जानेवारी पासून ते आतापर्यंत एकूण चार वाघांच्या मृत्यू संदर्भात आतापर्यंत पाच जणांना संशयित म्हणून अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असली तरीही त्यांनी तपास यंत्रणेच्या माध्यमातून हाताळलेले कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याबाबतची माहिती अशी की गोळवली येथील सिद्धेश्वराचे गुंफा या ठिकाणी 5 जानेवारी रोजी पहिल्या वाघाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते .त्यानंतर वनखात्याचे यंत्रणेच्या माध्यमातून व तपास यंत्रणेच्या खास सूचनेनुसार हाती घेण्यात आलेल्या कोम्ब?िग ऑपरेशन च्या माध्यमातून एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती. यांचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चौकशीत पावणे कुटुंबीयांनी अन्य तीन वाघांना ज्याठिकाणी पुरण्यात आले त्या संदर्भातील सविस्तरपणे चौकशी करून ते कशाप्रकारे पुरलेल्याची संदर्भाची माहिती प्राप्त करण्याचे धाडस या तपास यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱयांनी केले आहे.
गेले पंधरा दिवस तपास यंत्रणेचे पथक दिवस रात्र वेगवेगळय़ा माध्यमातून चौकशी करण्यास यशस्वी ठरलेले आहे. 5 जानेवारीपासून ते आतापर्यंत पहिला वाघाच्या गायब झालेल्या नखांचा शोध घेण्यासाठी सत्तरी तालुक्मया बरोबरच शेजारील तालुक्मयातही यासंदर्भात तपास घेण्याचे कार्य वेगवेगळय़ा स्तरावर करण्यास याअधिकाऱयांनी चांगल्या प्रकारचे योगदान दिले आहे .एका बाजूने राजकीय दबाव व दुसऱया बाजूने स्थानिक नागरिकांकडून वेगवेगळय़ा स्तरावर होणारी मागणी त्याच्या पार्श्वभूमीवर नखांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान या यंत्रणेसमोर उभे राहिले होते. मात्र कोणत्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता तपासाची यंत्रणा योग्य दिशेने मार्गक्रमण करीत योग्य संशयितापर्यंत जाण्याचे धाडस या तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेली आहे. नखाचा शोध लागला असलातरी या संदर्भात संशयितांना ताब्यात देण्याचे मोठे आव्हान आजही तपास यंत्रणेसमोर आहे.
यासंदर्भात त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्थानिक भागातील काही नागरिकांच्या यामध्ये सहभाग असण्याची शक्मयता वर्तवण्यात येत असून येणाऱया अवघ्या दिवसात या प्रकरणाला विलक्षण कलाटणी मिळून अनेक जणांना ताब्यात घेण्याची व्य?हरचना सध्यातरी तपास पथकाच्या माध्यमातून मुहूर्त स्वरूपात येत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. तपास अधिकारी नंदकुमार परब हे खात्यांमधील एक कर्तव्यनि÷ व जबाबदारीने काम करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे म्हादई अभयारण्याचे परिक्षेत्र अधिकारी विलास गावस यांनी आतापर्यंत वनखात्याच्या क्षेत्रात एक प्रामाणिक व धैर्याने पुढे जाणारे व्यक्तिमत्व असल्याचे सिद्ध झालेले आहे. यामुळे दोघाही कर्तव्यदक्ष अधिकाऱयांच्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून गोव्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली बदनामी यांच्या पार्श्वभूमीवर याचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून या दोन्ही अधिकाऱयांनी दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करताना आढळत आहेत.