वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गोळावली धनगरवाडा या ठिकाणी चार वाघांच्या मृत्यूप्रकरणी गेल्या दहा दिवसांपासून वनखात्याच्या कोठडीत बंद असलेल्या पाच संशयितांना आज वाळपईच्या प्रथम न्यायदंडाधिकारी दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे .यामुळे प्रत्येकाला 15 हजारांचा जमीन व नऊ दिवस तपासणी अधिकाऱयासमोर हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे। यावेळी संशयित यांच्यावतीने अँड. यशवंत गावस व वनखात्याच्यावतीने ?ड निखिल वझे यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायदंडाधिकाऱयांनी सदर संशयितांचा जामीन मंजूर केला. यामुळे सत्तरी धनगर समाज सेवा संघाने आनंद व्यक्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी की 5 जानेवारीपासून सत्तरी तालुक्मयातील गोळावली याठिकाणी धनगरवाडा भागांमध्ये चार वाघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. सदर वाघांना विषप्रयोगाचा वापर करून बळी घेतल्याचा आरोप करीत वनखात्याच्या यंत्रणेने विठो पावणे मालो पावणे बोमो पावणे भैरू पावणे व ज्योतिबा पावणे या पाच जणांना अटक केली होती. गेल्या जवळपास नऊ दिवसांपासून सदर संशयित तपासणी यंत्रणेच्या ताब्यात होते. सर्वप्रथम यासंशयितांना वाळपईच्या न्यायालयाने दोन दिवसांचा तर त्यानंतर सात दिवसांचा चौकशीसाठी रिमांड दिला होता .यामुळे जवळपास दहा दिवस सदर संशयित तपास यंत्रणेच्या कब्जात होते.
न्यायमूर्ती समोर जोरदार युक्तिवाद
दरम्यान संशयिताच्यावतीने ?ड यशवंत गावस यांनी त्याची बाजू भक्कमपणे बाजू मांडली. अटक करण्यात आलेल्या संशयित पूर्णपणे गरीब असून त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. ही मंडळी गेल्या शेकडो वर्षांपासून आदिवासी अवस्थेत राहत असून वाघांचा मृत्यू संदर्भात तपास यंत्रणेला दहा दिवसांचा वेळ मिळालेला आहे. यामुळे त्यांची तपासणी पूर्ण झाली असून या संशयितांना आणखीन चौकशीसाठी रिमांड देणे गरजेचे नाही. यामुळे त्याची सुटका करावी व त्यांना न्याय देण्याची मागणी यशवंत गावस यांनी न्यायमूर्ती समोर मांडली.
चार वाघाच्या मृत्यू संदर्भाचा अहवाल अजूनही डेहराडून येथील प्रयोग शाळेतून प्राप्त होणे बाकीचे आहे .यामुळे या संशयितांना वनखात्याच्या कब्जात ठेवणे निरर्थक असून त्यांची सुटका करावी अशा प्रकारचे विनंती यशवंत गावस यांनी केली.
वनखात्याच्यावतीने प्रतिवाद करताना अँड. निखिल वझे यांनी या प्रकारची तपासणी अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे संशयितांना आणखीन दहा दिवस रिमांड देण्याचा युक्तिवाद केला. यावेळी न्यायमूर्तीनै दहा दिवस आपणासमोर तपासणीसाठी उपलब्ध होते. यावेळी आपली तपासणी पूर्ण कशी झाली नाही अशा प्रकारचा सवाल केला. त्यावर आपला युक्तिवाद करताना ?ड निखिल वझे यांनी एका वाघाची नखे पूर्णपणे गायब असून याला संशयित तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सदर नखाचा काळया बाजारपेठेमध्ये व्यवसाय होण्याची संभावना व्यक्त केली. मात्र दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायमूर्तीनी संशयितांना जामिनावर मुक्त करत असल्याचा निर्णय दिला. सदर जामीन हा सशर्त असून प्रत्येकाला पंधरा हजारांच्या वैयक्तिक जामीन व येणाऱया नऊ दिवस सकाळी दहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान तपासणी अधिकाऱयांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे उघडण्यात आलेली आहे. यासंबंधीचा युक्तीवाद ऐकण्यासाठी न्यायालयात नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.
नखाचा शोध अजूनही नाही.
दरम्यान 5 जानेवारी रोजी गोळावले सत्तरी येथील पारंपारिक भुगत साजरी करण्यासाठी गेलेल्या सिद्धेश्वर गुंफा येथील मृतावस्थेत सापडलेल्या वाघाची नखे शोधून काढण्यासाठी वनखात्याच्या यंत्रणेला पूर्णपणे अपयश आलेले आहे. या संदर्भात वेगवेगळय़ा स्तरावर चौकशी करण्यात आली असली तरीही अजून पर्यंत सदर नखे न सापडल्यामुळे आज न्यायालयात यासंदर्भात युक्तिवाद करून संशयितांचा रिमांड वाढवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला .आता नखाच्या बाबतीत तपासणी यत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
घटनाक्रम
30 रोजी पावणे कुंटुबियाची म्हैस मारली.
5 जानेवारी -पहिल्या वाघाचा मृत्यू उघडकीस
8जानेवारी -संशयित विठो पावणे,मालो पावणे यांना अटक.
8 जानेवारी दोन वाघाचा मृत्यू उघडकीस.
9 जानेवारी एका वाघाचा मृत्यू निदर्शनास.
9 ज्योतिबा पावणे याना अटक.
10 भैरू पावणे याना अटक.
17 पर्यंत सर्व आरोपींना चौकशीसाठी
17 रोजी संशयिताना जामीन मंजूर.
अँड यशवंत गावस
दरम्यान या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ऍड यशवंत गावस यांनी सांगितले की वाघाच्या मृत्यु संदर्भात या संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी मुबलक स्वरूपाचा वेळ तपास यंत्रणेला उपलब्ध करून दिला होता. या नऊ दिवसात चौकशी जवळपास पूर्ण झाली असली तरी वनखात्याने त्यांच्यासाठी अधिक रिमांड द्यावा अशा प्रकारची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायमूर्ती ने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून संशयितांना जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिलेला आहे. वनखात्याचे वकील ऍड निखिल वझे यांनी संशयितांना जामिनावर सोडल्यास पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त केली होती मात्र ती निरर्थक स्वरूपाची होती कारण सध्यातरी मृत वाघाच्या अवयवाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अजूनही येणे बाकी आहे. यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे ऍड यशवंत गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.