दुष्काळी भागातील शेतकऱयांची मागणी : जिल्हय़ातील अनेक भागात चारा टंचाई : चाऱयासाठी भटकंती
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वषी झालेला समाधानकारक पाऊस अनेकांना दिलासादायक ठरला असला तरी जिह्यातील काही भागात चारा टंचाईची झळ पोहोचत आहे. त्यामुळे आतापासूनच जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी दुष्काळी भागातील शेतकऱयांनी केली आहे. जिल्हय़ात ओल्या दुष्काळामुळे अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात चाऱयाची समस्या निर्माण होत आहे. येत्या काळात चाऱयासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागण्याची शक्मयता असून आतापासून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
होत आहे.
काही दिवसांपासून अनेक ठिकाणी चारा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱयांवर मोठे संकट कोसळत आहे. बेळगाव जिल्हय़ात साधारणतः दरवर्षी मे महिन्यात चाऱयाची समस्या काही प्रमाणात निर्माण होते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने चाऱयाची व्यवस्था केली असली तरी अजूनही काही ठिकाणी ती करण्याची गरज व्यक्त होत आहे. जनावरांना चाऱयाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने गोशाळा सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
या ठिकाणी दुसऱया राज्यातून किंवा जिल्हय़ातून चारा आणून प्रशासनातर्फे सोय करण्यात येत आहे. मात्र येत्या काळात इतर राज्यात किंवा जिल्हय़ांमध्येही चारा मिळणे मुश्किल होणार यात शंका नाही. येत्या काळात राज्यातील सर्रास ठिकाणचा चारा संपणार आहे. त्यामुळे यापुढे आता काय करायचे? असा प्रश्न जनावरे पाळणाऱया शेतकऱयांना नक्कीच पडणार असल्याने यासाठी जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोय करण्यासाठी हालचाली गतिमान करण्याची गरज आहे.
सध्या जिल्हा प्रशासनाने इतर राज्यांमध्ये अधिक प्रमाणात चारा मिळेल का? याची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हय़ात अजून तरी चारा समस्या कमी असली तरी येत्या काळात ही समस्या भेडसावणारी ठरणार आहे. त्यामुळे आतापासून या समस्येकडे लक्ष दिल्यास पुढे त्याचा त्रास होणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त करण्यात येत आहे. पशु संगोपन खात्याच्या अहवालानुसार बेळगाव जिल्हय़ात 13 लाख 50 हजारहून अधिक जनावरे आहेत. या जनावरांना दरवर्षी 25 लाख मेट्रिक ट्रन चाऱयाची आवश्यकता असते. जिल्हय़ाला अधिक प्रमाणात चाऱयाची गरज पडल्यास दरवर्षी महाराष्ट्रातून चारा उपलब्ध होतो.
सध्यातरी उपलब्ध असलेल्या चाऱयामध्ये आणखी महिना-दोन महिने कसेबसे पार पडणार आहेत. मात्र त्यानंतरची परिस्थिती गंभीर असण्याची शक्मयता आहे. दरम्यान जर येत्या महिन्यात अवकाळी पाऊस पडला तर काही प्रमाणात ही समस्या मिटण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. चारा कमी होत असल्याने आता बेळगाव जिल्हय़ात चाऱयाची समस्या डोके वर काढु लागली असून यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुढील दोन महिन्यात गंभीर पाणीटंचाई
बेळगाव जिल्हय़ाबरोबरच इतर राज्यातही ही समस्या लवकरच डोके वर काढणार आहे. चाऱयाबरोबरच अनेक तालुक्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. तर काही भागात आतापासूनच पाण्याची समस्या निर्माण होतानाचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यावर भर देण्याची गरज आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात जिल्हय़ात पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांबराब्sारच जनावरांचेही हाल होत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चाऱयाची समस्या असल्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोफत चाऱयाचे बीज उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज असून प्रशासनाने आतापासून यासाठी हालचाली करणे महत्त्वाचे आहे.