संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्राकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. कोविड 19 च्या महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 2020 च्या कालावधीत जवळपास 5.9 टक्क्मयांची घसरण राहणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अर्थव्यवस्थेत वृद्धी पुढील वर्षापर्यंत परतणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालात अर्थव्यवस्थेचा वेग आकुंचन पावणार आहे. तसेच स्थायी स्वरुपात उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी राहणार असून महामारीवर नियंत्रण मिळवणे शक्मय नसल्याने ही चिंता व्यक्त केली जात आहे.
युएनच्या माहितीनुसार 2020 च्या दरम्यान दक्षिण आशियातील अर्थव्यवस्था 4.8 टक्क्मयांनी घसरली आहे. तर आगामी वर्षातही हा आकडा 3.9 टक्क्मयांवर राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच 2020 च्या दरम्यान भारताचा जीडीपी 5.9 टक्क्मयांनी कमी होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणामुळे विकासदरात मोठय़ा प्रमाणात पडझड झाल्याची नोंद केली आहे. व्यापार आणि विकासावर संयुक्त राष्ट्र संमेलनाच्या अहवालानुसार चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 4.3 टक्क्मयांची घसरण राहणार आहे.