वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय साखर कारखान्यांनी सध्याच्या साखर सत्रामध्ये आतापर्यंत जवळपास 62 लाख टन साखर पुरवठा करण्यासाठी निर्यातीचा व्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघ (एनआयएसटीए) यांनी दिली आहे.
यामध्ये ऑक्टोबर 2021 पासून साखर विपणन सत्र 2021-22 मध्ये आतापर्यंत 62 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी व्यवहार करण्यात आले आहेत. यामध्ये 47.84 लाख टन साखर विदेशात पाठविण्यात आली आहे. साखर कारखान्यामार्फत निर्यात करण्यात येणारी साखर सहकारी सबसिडीमुक्त आहे. चालू वर्षात साखर निर्यात सबसिडीव्यतिरिक्त केली जात असल्याची माहिती आहे.