ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशातील कोरोना बाधितांचा वाढता वेग कायम आहे. दिवसागणिक वाढणारी ही संख्या चिंतेची बाब बनत आहे. देशात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक ६९,८७८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण संख्या २९.७५ लाख पार गेली आहे. तर ९४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
यातील ६ लाख ९७ हजार ३३० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर आतापर्यंत २२ लाख २२ हजार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ५५ हजार ७९४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १० लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.