ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रात एका दिवसात 5368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 204 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 987 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आतापर्यंत राज्यात 9026 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 4.49 टक्के आहे. तर राज्यात सध्या 87 हजार 681 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकूण 3 हजार 552 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.37 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 15 हजार 262 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 35 हजार 447 नमुन्यांपैकी 2 लाख 11 हजार 987 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 265 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 46 हजार 355 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.