ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 7862 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 226 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 461 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
काल एका दिवसात एकूण 5366 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 32 हजार 625 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के इतके आहे. तर राज्यात एकूण 95 हजार 647 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल झालेल्या 226 मृत्यूंपैकी 73 मृत्यू हे एकट्या मुंबई महापालिकेतील आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर 4.15 टक्के आहे. तर आतापर्यंत 9893 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 12 लाख 53 हजार 978 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2,38,461जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 74 हजार 025 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 46 हजार 560 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.