मराठीतील एक ज्ये÷ साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ कवी आरती प्रभू यांनी आपल्या 46 वर्षांच्या अल्पायुष्यात लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, कविता, ललित निबंध आणि व्यक्तिचित्रे असे विविध साहित्य प्रकारात विपुल असे लेखन केले. बालसाहित्य आणि अनुवाद लेखनही केले. मात्र त्यांच्यातील उत्तुंग व अमर्याद प्रतिभेला मुक्त वाव मिळाला. तो ‘कादंबरी’ या विस्तृत साहित्य प्रकारात! या प्रतिभेच्या तेजस्वी दर्शनाने आजच्या तरुण पिढीतील वाचकवर्गही स्तिमित होऊन जातो. 26 एप्रिल हा चिं. त्र्यं. खानोलकरांचा स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांच्या कादंबरी लेखनाचा धांडोळा घेणारा हा लेख.
‘तात्या’, मागून एक म्हातारी हाक आली. तात्यानी वळून पाहिलं. थांबायचं मनात नव्हतं पण पावलंच थबकली. तात्यांनी त्या हाकेच्या मालकाकडे डोळे ताणून पाहिलं. ‘एखाद्या सुक्मया का÷ासारखा तो देह, उघडाबोडका कसातरीच उंच, त्यावर फक्त पांढरी स्वच्छ कफनी एखाद्या सालीसारखी लोंबकळत होती. त्याच्या डोळय़ात मात्र गोठलेल्या सोनेरी काळय़ा शाईसारखी तळप होती. हातपाय लांब होते. शिरावर सगळा जगाचा भार घेतल्यासारखं तांबूस जटांचे रान माजलं होतं’
‘कोंडुरा’ या खानोलकरांच्या अतिशय गाजलेल्या कादंबरीतील हा परिच्छेद वाचताच आपणास काय काय लक्षात येते? की इथे कादंबरीकाराने एक व्यक्तिचित्र उभे केले आहे. ते उभे करताना म्हातारी हाक, शुक्मया का÷ासारखा देह, कसातरीच उंच, सालीसारखी लोंबकळणारी कफनी, डोळय़ात गोठलेल्या सोनेरी काळय़ा शाईसारखी तळप, जगाचा भार घेतल्यासारखं तांबूस जटांचं रान अशा उपमांचा वापर केला आहे. मात्र या उपमा निव्वळ सोस म्हणून आलेल्या नाहीत. त्यांच्या आधारावर कादंबरीकाराने एक ठाशीव प्रतिमा चित्रित केली आहे. ज्या व्यक्तिमत्त्वाची ही प्रतिमा आहे ते वेगळे, गूढ, अलौकिक अशा स्वरूपाचे आहे. एरवी सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वे शब्द प्रतिमातून उभी करण्यास फारसे सायास लागत नाहीत. मात्र मुलखावेगळे व्यक्तिमत्त्व उभे करताना साहित्यिकाची प्रतिभा पणास लागते. खानोलकरांनी अवघ्या पाच सहा वाक्मयातच सिद्ध पुरुषाची अशी काही प्रतिमा ‘कोंडुरा’च्या आरंभीच उभी केली आहे की त्यानंतर हे अस्तित्व आभासी स्वरूपात अवघी कादंबरी व्यापून राहते.
अशा रीतीने ‘शब्द’ या माध्यमाचा प्रभावी वापर करून प्रतिमासृष्टी उभी करणे हे सर्जनशीलतेचे लक्षण. वास्तविक या पद्धतीची कारागिरी ही सातत्याने कवितेत आढळते. कारण ‘कविता’ या वाङ्मय प्रकारात कमीत कमी शब्दात बरेच काही निर्माण करायचे असते. अशा स्थितीत कादंबरीकार हा तितकाच सिद्धहस्त कवी असेल तर कोणती किमया घडू शकते याचे दर्शन खानोलकरी कादंबऱयात वारंवार होते. इ.स. 1961 ते 1977 या काळात खानोलकरांनी रात्र काळी घागर काळी ते दुष्टचक्र अशा एकूण 11 कादंबऱया लिहिल्या. त्यातही रात्र काळी…, अजगर, कोंडुरा, चानी, त्रिशंकू या त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या कादंबऱया. 11 प्रकाशित कादंबऱया ही तशी फार मोठी मजल नसली तरी खानोलकरांच्या कादंबऱयांची गुणात्मकता ही संख्यात्मकतेवर नेहमीच मात करत आली आहे.
चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीत, सामाजिक स्थिती, नियती, मनुष्यस्वभाव, नातेसंबंध, मनोगंड, अंधश्रद्धा, दैवाधिनता, वासना व विकृती हे मानवी जीवनाशी निगडित घटक प्रत्ययकारी रूपात प्रकटतात. विशिष्ट परिस्थितीच्या कचाटय़ात सापडलेले मानवी जीवन, या परिस्थितीत अधिक खोल रुतवणारे विविध प्रभावाने ग्रस्त झालेले मनोव्यापार किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी केलेला जीवापाड पण विफल संघर्ष हे खानोलकरांच्या कादंबऱयांचे मुख्य सूत्र. या सूत्राभोवती मानवी स्वभावाचे कंगोरे, मानवी परंपरा, समजुती व श्रद्धा, मानवी औदार्य आणि अधःपतन, परस्पर मानवी संबंधांचे अनोखे व गहिरे विश्व असा पट खानोलकर सूक्ष्म बारकाव्यानिशी प्रभावीपणे मांडतात. यातून जो एकत्रित परिणाम साधला जातो, निव्वळ त्यामुळे देखील खानोलकरांची कादंबरी श्रे÷ करू शकते. मात्र, अशावेळी आणखी एक महत्त्वपूर्ण घटक त्यांच्या कादंबरीत स्वाभाविकपणे पात्र म्हणून अवतरलेला असतो. ज्यामुळे कादंबरीकर म्हणून खानोलकरांचे स्वतंत्र असे वेगळेपण प्रस्थापित होते. तो म्हणजे कोकणभूमीतील निसर्ग! त्यांच्या कादंबऱयात तळ कोकणातील निसर्गसंपदा, तिच्या नानाविध विभ्रमानिशी रसरशीतपणे प्रकट होते. उदाहरणादाखल कोंडुरातील ही दोन अवतरणे. 1) पुनः पुन्हा लाटा विवराकडे प्रचंड देवमाशांसारख्या ओढल्या जातात आणि हाड मोडून उद्ध्वस्त झालेल्या आदिमानवासारखा कडय़ाच्या विवरात टाहो फोडून बाहेर पडतात. 2) अंब्या काजूची झाडं घाटीच्या दोन्ही अंगानी गच्च वाढली होती. एक प्रकारच्या ताज्या रानरसाचा वास उन्हासारखा वाऱयातून नसानसातून खेळत होता.
खानोलकरांच्या कादंबरीतील विश्व ज्या निसर्गाच्या निकट सान्निध्यात उभे राहते, तो निसर्गच मुळी गूढ, बहारदार, रौद्रभीषण अशी नाना रूपे प्रकट करणारा आहे. तो अस्थिर, मनमोहक, जीवघेणा व बेभरवशाचा आहे. त्याच्या सहवासातील माणसांचे जगही तोच स्वभावधर्म लेवून आहे. म्हणूनच खानोलकरांच्या कादंबऱयांचा आस्वाद घेताना त्यातील आकस्मिक कुस बदलणाऱया परिस्थितीमुळे वाचक स्तिमित होतो. त्याची उत्कंठा सदैव जागरूक राहते.
एखादा मानवी समूह जेव्हा दोष व वैगुण्यांनी ग्रस्त असतो तेव्हा त्या वैगुण्यांचे सहज भक्ष्य ठरते ती त्या समूहातील स्त्री. खानोलकरांच्या बहुतेक कादंबऱयात अशा स्त्रियांचे जीवन केंद्रस्थानी असते. खानोलकरांच्या कादंबरीतील पुरुष पात्रे अधिकतर विक्षिप्त, स्वार्थी, दुष्प्रवृत्त व हतबल आहेत, तर त्या तुलनेत त्यांनी उभी केलेली स्त्री पात्रे अधिक कणखर, सत्प्रवृत्त व सोशिक दिसतात. विविध स्वरूपी सामाजिक दोष व वैगुण्ये खानोलकर आपल्या कादंबऱयातून परिणामकारकरित्या प्रकाशात आणतात. त्यांच्यातील लेखक, विचारवंत हा समतावादी, प्रगतशील व सहिष्णू आहे हे वाचनाअंती जाणवते. आपल्या कादंबऱयातील मुख्य पात्रांबरोबरच लहान-सहान पात्रेही त्यांच्या स्वतंत्र वैशिष्टय़ानिशी सशक्तपणे उभी करण्याचे कसब खानोलकरांना आत्मसात होते. परिणामी कादंबरी वाचून संपल्यानंतरही त्यातील सारी पात्रे गारूड केल्यासारखी वाचकाभोवती फेर धरून उभी राहतात. ज्यामुळे कादंबरीस आगळाच जिवंतपणा प्राप्त होतो. या साऱया वैशिष्टय़ांमुळे मराठी कादंबरीविश्व आपल्या खास योगदानाने समृद्ध करणाऱया हरिभाऊ आपटे,. वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर, भालचंद्र नेमाडे या दिग्गजांत खानोलकरांचाही समावेश होतो. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
साहित्य रसिक