मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 45210 रूपयांची मदत
प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती करण्याबरोबरंच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालवणाऱया 133 कुटुंबांना अन्नधान्याचे वितरण केले. त्याचबरोबर मास्क वाटत व येथील जनतेच्या सहकार्यातून मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी 45210 रूपयांची मदत केली आहे.
कोरोना संसर्ग प्रादुर्भामध्ये शृंगारतळीच्या तीन ते पाच किलोमिटरच्या आयसोलेट प्रक्रियेमध्ये चिखली गावाचा काही भाग गेल्याने सरपंच ऋषिका चांदिवडे, उपसरपंच सुभाष दळवी, ग्रामसेवक एस. डी. जाधव, तलाठी उमेश राजेशिर्के आदींनी चिखली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये पत्रके वाटून जनजागृती केली. त्याचबरोबर मास्कचे वाटप करत ठिकठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम केले. गावातील गरजवंत कुटुंबाचा सर्वे केला. यामध्ये आजाराने त्रस्त असलेले तसेच नेहमीच्या मोलमजुरीवर कुटुंब चालवणाऱयांनी यादी तयार करून गावातील काही दात्यांच्या सहकार्यातून तसेच महसूल विभागाकडून आलेल्या अन्नधान्याचे 133 कुटुंबांना वितरण केले. गावातीलच काही दात्यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायत कमिटीने निधीचे संकलन करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 45210 रूपयाची मदत केली आहे.
आपल्या गावात मुंबईकर चाकरमानी केव्हाही येऊ शकतात. त्यासाठी त्यांच्या संस्थात्मक क्वारंटाईनसाठी 200जण सहज राहतील अशी जागा शोधून निश्चित केली आहे.