अध्याय चौदावा
भगवंत म्हणाले, भजनामध्ये भक्तांची भक्ति शुद्ध असली, म्हणजे मलासुद्धा त्यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते. जो जसा माझ्याशी वागतो, तसाच मी त्याच्याशी वागतो. भक्त माझ्या ठिकाणी अनन्य भक्ती ठेवतो, म्हणून मीही त्याच्यावर अनन्य भक्ती ठेवतो. माझ्या भक्तांचं माझ्यावर किती प्रेम आहे, हे मीच जाणतो. त्या प्रीतीच्या उपमेला त्रिभुवनात तोड नसते. माझ्या भक्तीने जो माझ्याशी अनन्य होतो, तेव्हाच त्याचे अज्ञान नाहीसे झाले असे समज. ब्रह्मदेव हे माझ्याच पोटचे पोर आहे. त्याचे सर्व लाड मी पुरवितो पण भक्तांच्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करत नाही.
थोडक्मयात सांगायचे झाले तर ब्रह्मदेवापेक्षा मला भक्त प्रिय आहेत कारण मी ब्रह्मदेवाला सृष्टीनर्मितीचे काम दिले पण त्या कामात तो आसक्त झाला आणि मी दिलेली ब्रह्मविद्या सुध्दा विसरला. त्याउलट माझे भक्त माझ्याकडून काहीही अपेक्षा न बाळगता, अत्यंतीक प्रेमाने मला जिंकून घेतात. याबद्दल आणखीही उदाहरणे तुला सांगतो म्हणजे तुझी खात्री पटेल. बलराम तर माझा ज्ये÷ बंधु आहे पण भक्तांप्रमाणे माझे सर्वस्वी प्रेम त्याच्यावरसुद्धा नाही. बलराम कौरवांच्या पक्षाला मिळालेला असल्याने व तो पक्ष असत्याचा असल्याने, बलरामाला कमीपणा आणून माझे भक्त असलेल्या पांडवांचे मी स्वतः संरक्षण केले.
भीष्मांनी प्रतिज्ञा केली तेव्हा समरांगणात मीच माघार घेऊन भक्तशिरोमणि धनुर्धारी अर्जुनाला तुझ्यादेखत वाचविले. लक्ष्मी माझी पट्टराणी, तिला मी माझ्या पायांशी सेवा करावयाला लावली आणि भक्तांमध्ये अग्रगण्य ज्या गोपिका आणि गौळणी त्यांना खांद्यावर घेतले. जे लक्ष्मीचा पूर्णपणे तिरस्कार करतात, तेच मला अत्यंत प्रेमाने पूज्य वाटतात. जे माझ्यापाशी लक्ष्मी मागतात, त्यांची लक्ष्मीही नाही आणि लक्ष्मीपतीही नाही अशी परिस्थिती होते. लक्ष्मीची उपेक्षा करणारे माझे भक्तच मला अत्यंत आवडतात. मला शंकर फार आवडता आहे पण त्याच्यापेक्षाही मला अशा भक्तांच्याबद्दल फार प्रेम वाटते. ज्या महादेवाच्या गुणामुळे मलाही शरीरावर सांवळा वर्ण धारण करावा लागला आणि ज्या महादेवाच्या बोलण्यावरूनच मला दुसऱयांदा मोहिनीचे स्वरूप घ्यावे लागले त्या मोहिनीच्या दर्शनातच मी शंकराला तत्काळ भुलविले आणि रुक्मांगदाला अर्धक्षणात त्याच मोहिनीपासून तारले. यावरून तुझ्या लक्षात येईल की, मला शंकरपेक्षा माझा भक्त अधिक प्रिय आहे. मी आपल्या हृदयावर अत्यंत आनंदाने माझ्या भक्ताच्या पायांची खूण (भृगुपदचिन्ह) धारण करतो. मला आपल्या स्वतःच्या देहाचीसुद्धा प्रीती नाही, म्हणूनच मी मोठय़ा आनंदाने गवळी झालो, आणि दऱयाखोऱयातून गाई राखीत राहिलो.
इतकेच नव्हे, तर भक्तांची घोडीसुद्धा खाजविली! त्रिभुवनात मी सर्वेच्छापरिपूर्ण आहे, तरी पण प्रेमळ भक्तांसाठी मात्र सदोदित सकाम झालेला असतो. प्रेमळ भक्तांची परमभक्ती पाहिली असता तेथे मी आत्माराम उडीच घालतो. प्रेमळ भक्त माझ्या दृष्टीला दिसला असता मी त्याला आपल्या बरोबरीला आणितो. किंवा तसे न घडेल तर मी त्याला परमोच्च सुख अर्पण करतो. आणि तो भक्त जर माझ्याजवळ न येईल, तर मी तत्काळ त्याचा चाकर होऊन
राहतो.
मोठेपणाचा मानमरातब सोडून मी आपल्या भक्तांची उष्टीसुध्दा काढतो. भक्तकार्यासाठी त्याच्या संकटात मी आपला देहसुद्धा ओवाळून टाकतो. उद्धवा ! तुझ्यासारख्या भक्तांकरिता मी आपल्या देहाचीसुद्धा उपेक्षा करतो. जे भक्त मला रात्रंदिवस आवडतात ते जीवाभावाने सर्वस्वी मला लाडके आहेत.
थोडक्मयात, संपूर्ण निस्वार्थ भक्तांची चित्तशुद्धी झालेली असल्याने, त्यांची बुद्धी नित्य काय अनित्य काय याचा निर्णय करत असते, त्यामुळे माझ्याबद्दल त्यांच्या मनात अनन्यता निर्माण होते. अशा भक्तांनी भजन करणारा, भजन आणि ज्याचे भजन होते अशी मिथ्या त्रिपुटी बाळगून भगवंतांचे भजन केले तरी, त्यातील भक्तांच्या चित्तशुद्धीला महत्त्व देऊन भगवंत त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतात.
क्रमशः