प्रतिनिधी/ सातारा
तब्बल सात महिन्यांनी जिल्हाधिकाऱयांनी चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सात ते आठ महिने झाले चित्रपटगृह आणि सातारा शहरातील शाहू कला मंदिर बंद असल्याने आतमध्ये अस्वच्छता झाली होती. शुक्रवारी सकाळपासून स्वच्छता करण्यास सुरुवात केली असून अजून एकही नवीन चित्रपट लवकर प्रदर्शित होणार नसल्याने अजून एक आठवडाभर चित्रपट शौकिनांना वाट पहावी लागणार आहे. राजलक्ष्मी, समर्थ आणि सेव्हनस्टार या तिन्ही चित्रपटगृहात ’तानाजी’ या चित्रपट हा शेवटचा ठरला. तर शाहू कला मंदिरात ’तू ही रे’ हे शेवटचे प्रायोगिक नाटक झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीला शासनाने चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यावरून शहरातील राजलक्ष्मी, समर्थ आणि सेव्हनस्टार या तिन्ही सिनेमा गृहात तानाजी हा सिनेमा सुरू होता. शेवटचा शो 16 मार्चला झाला त्यानंतर सर्व बंद ठेवण्यात आले. चित्रपट गृहात आता परवानगी देताच आता शुक्रवारी इतरवेळी चित्रपट नवीन येत असतो. तो पहाण्यासाठी गर्दी होत असते. ब्लॅकने तिकीट विक्री होत असते. परंतु कोरोनामुळे सर्व बंद होते मात्र आता जरी परवानगी दिली असली तरी नवा कोणताही चित्रपट नाही.
जुना चित्रपट दाखवला तर प्रेक्षक येतील का?, आले तर त्यांना मास्क, सॅनिटायझर यामध्येच जास्त खर्च सोसावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तर चित्रपटगृहे अजून ही टाळे बंदच आहेत. आधीच कोरोनामुळे चित्रपट गृहे सात ते आठ महिने बंद होती त्यामुळे चित्रपटगृह चालकांचे नुकसान झाले. परवानगी दिली असली तरी अजून काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.