बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले आहे. सुमारे एक दशकानंतर ती पडद्यावर दिसून आली आहे. अलिकडेच ‘थलाइवी’ चित्रपटात ती झळकली होती. तर तत्पूर्वी 2010 मध्ये भाग्यश्रीला ‘रेड अलर्ट ः द वॉर विदइन’ चित्रपटात पाहिले गेले होते. आरोग्यसंबंधी समस्येमुळे भाग्यश्रीने न्यूट्रीशन आणि फिटनेसचे अध्ययन केले होते. अलिकडेच एका मुलाखतीत भाग्यश्रीने अखेर चित्रपट जगतापासून इतकी वर्षे का दूर रहावे लागले याचे कारण सांगितले आहे.
2014-15 मध्ये ‘लौट आओ त्रिशा’चे चित्रिकरण सुरू असताना मला माझ्या हाताची हालचाल करता येत नव्हती. सुमारे एक वर्षानंतर ही स्थिती सुधारली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मी न्यूट्रीशन आणि फिटनेसचे शिक्षण घेतले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितल्याने मी घाबरले होते. परंतु मी स्वतःच माझी समस्या दूर केली. डॉक्टरांसाठी देखील हे आश्चर्यकारक होते. साधारण जीवनाद्वारे आपण काहीही साध्य करू शकतो याची जाणीव झाल्याचे भाग्यश्रीने सांगितले आहे.
1989 मध्ये प्रदर्शित ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाद्वारे भाग्यश्रीने चाहत्यांची मने जिंकली होती. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि ती एका रात्रीत स्टार झाली. पहिल्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता.