बॉलिवूडमध्ये आता अभिनेत्री विवाहानंतरही अत्यंत सक्रीय असतात. इतकेच नाही तर विवाह तसेच मातृत्वानंतरही दमदार भूमिका साकारताना दिसून येतात. पूर्वी विवाहानंतर अभिनेत्रींची कारकीर्द संपल्याचे मानले जायचे, तर आता अभिनेत्रींनी ही धारणा बदलली आहे. यात करिना कपूर, प्रियांका चोप्रा यासारख्या अभिनेत्रींचे नाव सामील आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल या यादीत सामील होऊ शकलेली नाही. काजल बॉलिवूडमध्ये फारशी यशस्वी ठरली नसली तरीही ती दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री आहे.
विवाहानंतर तिच्या कारकीर्दीत अडचणी येत आहेत. काजलला चांगले चित्रपट मिळेनासे झाल्याने तिने स्वतःचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारकीर्द सुरू रहावी आणि चित्रपट मिळावेत म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे. उद्योजक गौतम किचलूसोबत विवाह केल्यापासून तिला चांगल्या चित्रपटांचे प्रस्ताव मिळत नसल्याची स्थिती आहे.
बॉलिवूडच्या ‘सिंघम’ आणि ‘स्पेशल 26’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली काजर दाक्षिणात्य चित्रपटांसाठी कोटय़वधी रुपये आकारणाऱया अभिनेत्रींपैकी एक आहे. पण आता तिने चित्रपटात काम करण्यासाठीचे शुल्क निम्मे केले आहे. काजल आता चिरंजीवी यांच्यासोबत ‘आचार्या’ चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर नागार्जुन यांच्यासोबत ‘इंडियन 2’मध्येही झळकणार आहे.