मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षानंतर दारूबंदी उठवण्यात आली आहे. दारूबंदीमुळे अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारी जिल्ह्यात बोकाळली होती, म्हणून हा निर्णय घेण्यात आलं असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जयंत पाटील यांच्यावर त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, क्या हुवा तेरा वादा….जयंतराव जी..सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार…..इस आश्वासन का…यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, अशा शब्दात जयंत पाटील यांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये विधानसभेत यवतमाळच्या दारूबंदीवर जयंत पाटील बोलताना दिसत आहेत.
कालच मला स्वामिनी जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या काही भगिनी भेटल्या. त्यांची मागणी काय होती, यवतमाळमध्ये दारूबंदी करा. आम्ही मध्ये संघर्ष यात्रा केली. त्यावेळी त्या भेटल्या आणि म्हणाल्या दारूबंदी करा. मी त्यांना सांगितलेलं आहे, सुधीरभाऊ करतात की नाही ते बघा. नाही तर आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारुबंदी करू. हे आश्वासन मी त्यांना दिलं आहे, लिहून घ्या. चंद्रपूरला दारुबंदी होते, त्या महिलांचा साधा प्रश्न आहे की यवतमाळला का होत नाही? आणि सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना दारुबंदी का होत नाही?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला होत