ऑनलाईन टीम / मुंबई :
आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यावर 12 जून 2020 ला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. कोणी दिलं कॉन्ट्रॅक्ट? रेल्वे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण??? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला खरा चेहरा दाखवला.
भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. काल झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, 12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.