ऑनलाईन टीम / बीजिंग :
चिनी वस्तू भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनल्या आहेत. त्यामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे, भारतीयांना कदापि शक्य होणार नसल्याचे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. हा तणाव फार गंभीर नाही, तरी देखील काही भारतीयांकडून सामान्य नागरिकांना चीनविरोधात भडकवण्यात येत आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची विनंती केली जात आहे. सोनम वांगचूक यासारख्या सामान्य व्यक्ती युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भारतीयांना विंनती करत आहेत.
मात्र, चिनी वस्तू भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा घटक आहेत. त्यामुळे त्यांना भारतीयांच्या जीवनातून हद्दपार करणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे भारतीयांचे हे आवाहन अपयशी ठरेल, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.