30 वर्षे उलटूनही प्रश्न जैसे थे, गोवळकोट पुनर्वसन समितीची स्थापना, 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा
चिपळूण शहरतील गोवळकोट ग्रामस्थांचे पुनर्वसन गेले अनेक वर्षापासून रखडले असून या प्रश्नसंदर्भात गोळकोट पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली आहे. लालफितीच्या कारभारात अडकलेला हा पुनर्वसन प्रश्न तात्काळ निकाली निघावा यासाठी या समितीच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आले असून याबाबचे निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना देण्यात आले आहे.
15 जुलै 1990 रोजी पिडीजात रहिवासी असलेल्या या गोवळकोट ग्रामस्थांना अतिवृष्टीमुळे 27 कुटूंबाच्या घरांना धोका निर्माण झाला होता. त्यानंतर तत्काळीन तहसीलदारांनी या ग्रामस्थाचे कोयना प्रकल्पाच्या मालकीच्या चाळीत स्थलांतर केले होते. दोन वर्षे ही कुटुंबे तेथे राहीली. मात्र चाळी तोडल्यामुळे पुन्हा धोकादायक घरामध्ये राहण्याची वेळ आली. याबाबत गोळकोट ग्रामस्थांनी वारंवार विनंत्या, अर्ज करुन प्रशासनाने मात्र यात प्रगती साधली नाही.
हा प्रकार सुरु असताना या ग्रामस्थांना 2016 रोजी शायकीय यंत्रणेचा वापर करुन घराबाहेर काढून त्याची तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था लगतच्या मराठी शाळामध्ये केली. शिवाय तात्काळ पुनर्वसन करण्याची हमीदेखील प्रशासनाने दिली होती. मात्र साडेचार वर्षे होऊनही पुनर्वसनाचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. उलट ग्रामस्थ ज्या शाळेत रहात आहेत, ती शाळा खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. मुळातच ग्रामस्थांची घरे शायकीय यंत्रणेने सील केली आहेत गेली. साडेचार वर्षे ही घरे बंद राहिल्यामुळे ती मोडकळीस आली आहेत. गोवळकोट येथील नियोजित प्रकल्पही कार्यान्वित झालेला नाही. अशा परिस्थितीत रहायचे कुठे, असा प्रश्न आता ग्रामस्था समोर निर्माण झाला आहे.
या पुनर्वसन प्रश्नी संपूर्ण गाव तसेच तालुक्यातील बौध्द समाज व सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटना एकवटल्या असून यामाध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गोवळकोट पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढा दिला जाणार असून त्याचे पहिले पाऊल म्हणून 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी पवार यांना देण्यात आले आहे. दरम्यान, या पूर्वी या ग्रामस्थांचे गावातीलच कोयना प्रकल्पाच्या जागेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. त्याठिकाणी पक्क्या स्वरुपात हे पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुनर्वसन समिती अध्यक्षपदी कृष्णा बुरटे
गोवळकोट पुनर्वसन समितीच्या अध्यक्षपदी भगवान कृष्णा बुरटे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सुरेश कदम, किरण बांदे, वसंत भैरवकर, सचिव उदय जुवळे, सहसचिवपदी श्रीराम शिंदे, सहसचिवपदी सुभाष जाधव, संतोष मोहिते, सल्लागारपदी शिवदास तांबे, दत्ताराम मोहिते, राजेश जाधव, तर सदस्यपदी म्हणून प्रशांत पोतदार, नितीन भैरवकर, उपेंद्र हरवडे, चंद्रकांत कदम, शरद खापरे, अनंत कदम, बबन मोहिते, प्रवीण हरवडे, किशोर सैतवडेकर, अरुण कदम, सुभाष मोहिते, राजू जाधव, महेश सकपाळ, के.डी.कदम, मंगेश जाधव, प्रशांत मोहिते, सचिन गमरे, संदेश कदम, अलोक मोहिते, सचिन मोहिते, दिलीप मोहिते, अमोल कदम यांची निवड करण्यात आली आहे.