• मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याचे रत्नागिरी जिल्हयात तीव्र पडसाद
• चिपळूनात दोन ठिकाणी शिवसेनेकडून राणेना रोखण्याचा प्रयत्न, तणावपूर्ण वातावरण मराठा समाजाच्या सत्कार कार्यक्रमात शिवसेनेकडून अडथळा, दोन्ही कार्यकर्त्यात झटाप
• नियोजित कार्यकम आटोपुन राणे संगमेश्वरच्या दिशेने रवाना
• बाहेरील समर्थकांना रोखण्यासाठी लांजा राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची फिल्डींग
• आमदार नितेश राणेंच्या वाहनाला रत्नागिरी जिल्हयात पोलिसांकडून मुभा
पतिनिधी / चिपळूण :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी रत्नागिरी जिल्हयात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या जनआर्शीवाद यात्रेप्रसंगी शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन ठिकाणी राणेना रोखण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून झाला. यावेळी किरकोळ दगडफेक झाली, बॅनर फाडण्यात आले. तर मराठा समाज सत्कार कार्यक्रमावेळी शिवसैनिकानी पुन्हा अडथळा आणल्यानंतर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही बाजूनी प्रचंड घोषणाबाजीसह झटापट झाल्याने मात्र पोलिसानी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे महामार्ग काहीकाळासाठी बंद करावा लागला. मंगळवारी सकाळपासून चार तास चिपळूण तणवाखाली राहीला. राणे रत्नागिरीकडे निघाल्यानंतर पोलिस आणि चिपळूणकरानी सुटकेचा निश्वास सोडला. महामार्गावर वालोपे येथील हॉटेल रिम्झमध्ये मुक्काम असलेल्या राणेनी सकाळी चिपळूणकडे प्रयाण केल्यानंतर बहादूरशेख नाका येथे सकाळी 10.30 वाजता राणे समर्थक, भाजपा व शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तणावग्रस्त बनले आहे. जिल्हयात गुहागर, खेडमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून गुहागरात नाक्यावर राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. चिपळून-बहाद्दुरशेख नाका येथेराणेंच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर राणे समर्थकभाजप कार्यकर्त्यांनी त्यास जोरदार पत्यूत्तर दिले. महाड येथील मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या कालच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राणेंचीजनआशिर्वाद यात्रा रोखण्याचा निर्धार केला असला तरी राणेंनी चिपळून मधील आपले नियोजित कार्यकम आटोपून संगमेश्वरच्या दिशेने पस्तान केले. चिपळून येथील मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकमात शिवसैनिकांनी अडथळा आणण्याचा पयत्न केला असताना काहीसे वातावरण तणावपूर्ण बनले. परंतू पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्यानंतर कार्यकम पूर्ण करुनच राणे पुढील दौऱयाला रवाना झाले.
शिवसेनेच्या आक्रमकतेला मी जुमानत नाही
माझ्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, मी काय साधा माणूस वाटलो का? अशा शब्दांत आपला संताप व्यक्त करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगीतले. मीशिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही, आम्ही डबल आक्रमक आहोत नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होतंय पाहूया असं आव्हानही त्यानी यावेळी शिवसेना दिलं.