जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण,
चिपळूण प्रतिनिधी
शहरात मारण्यात आलेल्या लाल आणि निळ्या रेषांमुळे विकासावर परिणाम होणारा असला तरी या रेषा एनजीटीच्या आदेशाने निर्माण झालेल्या आहेत. तीचे उल्लंघन करण्याचा अधिकार राज्यसरकार अथवा आम्ह कुणालाही नाही. त्यामुळे नदीतील अडथळे दुर करून खोलीकरणानंतर फेरसर्वेक्षण करावे लागेल असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिले.
ते पुढे म्हणाले की, निळया आणि लाल पुररेषेबाबत काही सवलती द्याव्यात, काही भागात वेगळी ट्रिटमेंट द्यावी, असे वाटले तरी हे सर्व क्लिष्ट कायद्याने अडकलेलं काम आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण झाल्यावर नदीपात्रात पाणी किती जाईल आणि बाहेर किती येईल, हे स्पष्ट होणार आहे. मात्र खोलीकरणातून पाणी वेगाने पुढे जाऊन शहरात घुसरणारे पाणी कमी झाल्यास या रेषाही जवळ येऊ शकतात. असे झाले की पुर्नसर्वेक्षण करावे लागेल असेही त्यांनी सांगीतले.