ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर चीन आता भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आजपासून इमेलच्या माध्यमातून चीन हा हल्ला करू शकतो, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीन आजपासून भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला इमेलच्या माध्यमातून होऊ शकतो. भारतातील 20 लाख लोकांचे ईमेल टारगेटवर आहेत. चीन ncov2019.gov.in या ईमेल आयडीचा वापर करेल. या ईमेलचा विषय ‘Free Covid 19 Test’ असा असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे इमेल नागरिकांनी ओपन करू नयेत.
चिनी हॅकर्स या सायबर हल्ल्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे इमेल आल्यास ते न उघडता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.