गलवान संघर्षानंतर पहिली उच्चस्तरीय भेट : तणाव दूर करण्यास होणार मदत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गलवान खोऱयात हिंसक झटापटीनंतर आता भारत आणि चीनच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये नरमाई दिसून येत आहे. सर्वकाही सुरळीत राहिल्यास चीनचे विदेशमंत्री वांग यी चालू महिन्याच्या अखेरीस भारताच्या दौऱयावर येऊ शकतात. कोरोना महामारी आणि गलवान खोऱयातील हिंसक झटापटीनंतर चीनच्या कुठल्याही मोठय़ा नेत्याचा हा पहिला भारत दौरा ठरू शकतो.
भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये मागील 2 वर्षांपासून तणाव आहे. दोन्ही देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुमारे 1 लाख सैनिक तैनात आहेत. वांग यी यांच्या भारत दौऱयासाठीचा प्रस्ताव चीनकडून आला आहे हे महत्त्वपूर्ण आहे.
दोन्ही देशांनी परस्परांच्या यशासाठी काम करायला हवे. विदेशी शक्ती भारत आणि चीनमधील समस्या वाढवत आहेत असे वांग यी यांनी अलिकडेच म्हटले होते. वांग यी यांचा हा दौरा झाल्यास क्वाड आणि युक्रेन युद्धावर भारत आणि चीनदरम्यान चर्चा होऊ शकते. चीनचे विदेशमंत्री 26 मार्च रोजी नेपाळला जात आहेत. वांग यी 24 ते 26 मार्चदरम्यान भारतात येणार असल्याचे मानले जातेय. चीनचे विदेशमंत्री भारतात आल्यास याचे अत्यंत मोठे भूराजनयिक महत्त्व असणार आहे. रशियाने युक्रेनविरोधात 21 दिवसांपासून युद्ध पुकारले असताना हा दौरा होणार आहे. भारत, रशिया आणि चीनच्या आरआयसी ग्रूपमध्ये चीन चालू वर्षात अध्यक्ष आहे. 2020 नंतर चीन अन् भारताचे विदेशमंत्री अनेकदा परस्परांना भेटले असले तरीही ही भेट त्रयस्थ देशातच झाली आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा ही लडाखमधील सीमा वाद सुटल्यावरच होणार आहे. तसेच हा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनची असेल असे भारताने