ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षानंतर चीनने ताब्यात घेतलेल्या दहा जवानांची 3 दिवसानंतर गुरुवारी सायंकाळी सुटका करण्यात आली.
सोमवारी रात्री आणि मंगळवारी भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 43 जण मारले गेले. यावेळी चीनने 10 भारतीय जवानांना ताब्यात घेतले होते. यामध्ये 2 मेजर्सचाही समावेश होता.
दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी आणि चीनच्या ताब्यात असलेल्या 10 जवानांची सुटका करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून भारत आणि चिनी लष्कराच्या मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांची सतत चर्चा सुरु होती. त्यानंतर या जवानांची सुटका करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने अद्याप याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.