लष्करप्रमुखांची माहिती : उत्तर-पूर्व कमांडमधील अधिकाऱयांशी साधला संवाद
लष्करप्रमुख म्हणाले…
- भविष्यातील धोक्मयांची आम्हाला पूर्ण जाणीव
- सीमेवरील सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर
- सीमारेषेवरील परिस्थितीचा वेळोवेळी आढावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर आणि पूर्व कमांडमध्ये तैनात असलेल्या लष्करी अधिकाऱयांशी चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी लष्कराच्या रचनेत बदल केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. सैन्याची पुनर्रचना, पुनर्संतुलन आणि री-ओरिएंटेशन केले जाणार असल्याची माहिती देत तिन्ही दलांमध्ये समन्वयाचे कामही रितसरपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला लष्कराचे नवे उपप्रमुख मनोज पांडेही उपस्थित होते. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
आम्हाला भविष्यात येणाऱया धोक्मयाची जाणीव आहे आणि आम्ही त्यासाठी सज्ज होत आहोत. सीमेवरील सुरक्षा अधिकाधिक भक्कम ठेवण्याकडे आमचा कल असल्याचे नरवणे यांनी स्पष्ट केले. तसेच अफगाणिस्तानमधील घडामोडींवरही भारत लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. नजिकच्या काळात सुरक्षा दलात काही महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. अलीकडेच, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची उधमपूरस्थित उत्तर सेक्टरचे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांची पूर्व सेक्टरचे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2020 पासून चीन सीमेवर तणाव
जून 2020 मध्ये गलवान खोऱयात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीनंतर सीमेवर तणाव आहे. चीनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या 14 फेऱया झाल्या आहेत. चर्चेची पंधरावी फेरीही लवकरच होणार आहे. सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे. चीनला लागून असलेल्या भागात लष्करी क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सीमेवरील घुसखोरी हे मोठे आव्हान आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्करी जवानांकडून व्यापक मोहीम राबविली जात आहे. 2019 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत पाकिस्तानकडून 5,600 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली होती.