ऑनलाईन टीम/तरुण भारत
चीननं पुन्हा एकदा भारताला भडकवण्याचं काम केलंय. चीननं अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावं बदलली असून या ठिकाणांना ‘चिनी’ शब्दांत नाव देण्यात आली आहेत, त्यामुळं भारत-चीन वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार चीनच्या नागरी मंत्रालयानं नियमांनुसार, चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट किंवा जंगनान म्हणत आहे. चायनीज अक्षरांत ही नाव देण्यात आली आहेत. ज्या 15 ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत, ती भारतातील अरुणाचल प्रदेशचा भाग आहे. 15 बदललेल्या नावांपैकी आठ निवासी ठिकाणं, चार पर्वत, दोन नद्या आणि एक पर्वतीय खिंड आहे. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना चिनी नावं देण्याचं काम दुसऱ्यांदा चीननं केलंय. याआधी 2017 मध्ये चीननं सहा ठिकाणांना स्वत:चं नाव दिलं होतं.