ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखमधील तणाव आणखी वाढेल, असे कोणतेही पाऊल भारत आणि चीन उचलणार नसल्याचा प्रस्ताव दोन्ही देशांनी मान्य केला होता. मात्र, चीनने या प्रस्तावाचे उल्लंघन करत पूर्व लडाखमधील सीमारेषेवर सैन्य वाढवले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
चीनने लडाखच्या देपसांगमधील सैनिकांची संख्या वाढवून स्वत:ची स्थिती मजबूत केली आहे. चीन आता दौलत बेग ओल्डीजवळच्या नव्या जागांवरही सैनिकांची संख्या वाढवतआहे. चीनकडून सुरू असलेल्या हालचाली पाहता भारताने सतर्कता बाळगून युद्धसज्जता ठेवली आहे.
यापूर्वी प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन्ही देशांचे 50-50 हजार सैन्य तैनात होते.