ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादूर्भाव वाढल्याने यंदाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 25 लोकांचा बळी गेला आहे. तर 830 लोकांना याची लागण झाली आहे. चीनमधील 20 प्रांतीय भागांमध्ये एकूण 1072 संशयित आढळले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय बीजिंगमधील भारतीय दूतावासाने घेतला आहे.
वुहान आणि आसपासच्या परिसरात 700 भारतीय विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. चीनमध्ये राहणाऱया सर्व भारतीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे चीनी अधिकाऱयाने सांगितल्याचे भारतीय दूतावासाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.