सारस्वत महिला मंडळाचा 22 वा वर्धापन दिन साजरा
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱयाचा आणि त्वचेचा पोतही वेगळा असतो. त्यामुळे आपली त्वचा तेलकट, मुलायम किंवा रूक्ष या कोणत्या प्रकारात मोडते, हे जाणून घेऊनच चेहऱयावर प्रसाधनांचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत सौंदर्यतज्ञ रचना मुदलियार यांनी व्यक्त केले.
सारस्वत महिला मंडळाचा 22 वा वर्धापन दिन शुक्रवारी सकाळी उदय भुवन येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा विनिता नाईक, सचिव उमा शहापूरकर व केटरर साधना पाटील उपस्थित होत्या.
रचना मुदलियार पुढे म्हणाल्या, चेहऱयाच्या सौंदर्याइतकेच त्याची निगा राखणे महत्त्वाचे आहे. यासाठी डे क्रीम आणि नाईट क्रीम महत्त्वाचे ठरतात. डे क्रीम आपल्या चेहऱयाचे संरक्षण करतात तर नाईट क्रीम चेहऱयाच्या त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवितात. त्याबरोबरच रात्री झोपताना क्लिंझिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. बाजारात शेकडो सौंदर्य प्रसाधने येतात. परंतु दररोज वेगवेगळे क्रीम बदलू नये. आपल्या चेहऱयाला कोणते क्रीम योग्य आहे, याची माहिती करून घेऊनच त्याचा वापर करावा. केसांसाठी कोणत्याही तेलापेक्षा शुद्ध खोबरेल तेल उपयुक्त आहे. तसेच स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱया भाज्यासुद्धा चेहऱयाच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरतात. चेहऱयावर टोमॅटो लावल्याने चेहरा काळवंडत नाही. त्याचप्रमाणे आहारात विविध प्रकारचे सॅलड असणे उपयुक्त ठरते. कडकडीत पाण्याने आंघोळ करणे किंवा असे पाणी डोक्मयावर घेणे हानीकारक ठरू शकते, अशी माहितीही मुदलियार यांनी दिली.
वर्धापन दिनानिमित्त बटाटय़ापासून गोड व तिखट पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गोड विभागात अनिता कामत, निशा तेंडोलकर व राधिका तेंडोलकर यांनी तर तिखट विभागात रश्मी सडेकर, राधिका तेंडोलकर व शीतल कर्नाटकी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांची बक्षिसे मिळवली. यावेळी घेण्यात आलेल्या खेळांमध्ये शोभा केशकामत, शिल्पा कामत व शिल्पा कर्नाटकी यांनी बक्षिसे मिळविली.
प्रारंभी मंडळाच्या अध्यक्षा विनिता नाईक यांनी स्वागत केले. मनीषा कक्केरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उमा सोनवडेकर यांनी अहवाल वाचन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार यशश्री देशपांडे, संध्या सडेकर, उमा सोनवडेकर, प्रज्ञा शानभाग, उषा शानभाग, मंगला तिळवे, मनीषा कक्केरी, अपर्णा वेलंगी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संध्या सडेकर यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.