प्रतिनिधी /वाळपई
गोवा बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरामध्ये आज दोन ठिकाणी झाडे पडल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडला. यामुळे वाहनांच्या मोठय़ा प्रमाणात रांगा लागल्या होत्या. यंदा सदर मार्गावरील धोकादायक झाडे कापण्याची प्रक्रिया हाती घेण्यात न आल्यामुळे वारंवारपणे झाडे पडून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे. येणाऱया काळातही अशाच प्रकारची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
याबाबतची माहिती अशी की गोवा बेळगाव दरम्यानच्या चोरला घाट परिसरात आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दोन ठिकाणी झाडे पडली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प होण्याचे प्रकार घडला. याबाबतची माहिती वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर पथकाने घटनास्थळी त्वरित धाव घेतली व रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. दोन तासांनी दोन्ही ठिकाणी असलेली झाडे मोकळी करण्यात आल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला गोव्यातील बेळगावकडे बेळगावहून गोव्याकडे येणारी मोठय़ा प्रमाणात वाहने यामुळे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी मोठय़ा रांगा लागल्या होत्या. डिचोली वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यावर भर देण्यात आलि.
यावेळी कोणत्या प्रकारच्या अनुचित प्रकार घडला नाही. दरवषी पावसाळय़ापूर्वी या मार्गावरील धोकादायक झाडे कापण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असते. यंदा मात्र सदर काम हाती घेण्यात आलेली नाही. यामुळे वारंवारपणे या घाट परिसरात झाडे पडून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. खास करून रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे घनदाट जंगलामध्ये प्रवासी वर्गाला धोकादायक अवस्थेत राहावे लागत आहे. पावसाळय़ापूर्वी ही प्रक्रिया हाती का घेण्यात आली नाही या संदर्भाची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र यापुढे सुद्धा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. कारण अनेक ठिकाणी आजही अनेक झाडे धोकादायक अवस्थेत आहेत. थोडासा वारा लागला तरीसुद्धा ही झाडे रस्त्यावर पडतात व वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडतो. सध्यातरी या मार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .यामुळे हा रस्ता प्रवासी वर्गाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. दरम्यान वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. वाळपई ते केरी दरम्यानचे अंतर जवळपास 30 किलोमीटर आहे. यामुळे अशा प्रकारची घटना घडल्यास सदर ठिकाणी पोहोचण्यासाठी निदान एक तास काढावा लागतो .यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून उपलब्ध झाली.