दीड महिन्यात फक्त सात किलोमीटरचे काम
प्रतिनिधी / वाळपई
गोवा बेळगाव दरम्यानच्या भागाला जोडणारा चोरला मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे रखडले आहे .एक महिन्यात अवघ्या सात किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून यामुळे नागरिकांनी व प्रवासी वर्गाने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली आहे. कत्रांटदार यंत्रणेकडून वेगवेगळय़ा प्रकारचे कारणे देण्यात येत असली तरीसुद्धा कामाची गती पूर्णपणे मंदावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .यामुळे या कामाला गती प्राप्त करून द्यावी अशा प्रकारची मागणी नागरिक व प्रवासी वर्गने केलेली आहे.
सुमारे नऊ कोटी खर्च करून राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. 26 जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता यामुळे हे काम पंधरा दिवसात आटोपते घेणार अशा प्रकारचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. मात्र सदर आश्वासन पूर्णपणे हवेत विरले आहे. या कामाची गती पूर्णपणे मंदावली आहे .कंत्राटदाराची यंत्रणा धिम्यागतीने काम करीत असून आतापर्यंत फक्त सात किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. दीड महिना संपत आला तरीसुद्धा या रस्त्याचे डांबरीकरण संपत नसल्यामुळे अनेक स्तरावर वाहनचालकांची व या मार्गावरुन प्रवास करणाऱया प्रवाशांची गोची होताना दिसत आहे .सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही का अशा प्रकारचा सवाल आता यामुळे निर्माण झालेला आहे. हा रस्ता सध्यातरी वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण बेळगाव दरम्यानचा अनमोड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे .यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक याच बाजूने वळविण्यात येत आहे .वारंवारपणे वाहतुकीची कोंडी होत असून सदर काम गतीने झाले असते तर आतापर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असते. मध्यंतरी जवळपास दहा दिवस या रस्त्याचे काम बंद झाले होते. कंत्राटदाराच्या वाहनाला अपघातांना सामोरे जावे लागले असल्यामुळे हे काम बंद करण्यात आले होते. आता कामाला पुन्हा सुरुवात झाली असली तरी सुद्धा अत्यंत धीम्यागतीने काम होत असल्याचे प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे. पूर्वी या महामार्गाचा ताबा गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे वाळपई विभागाकडे देण्यात आला होता. मात्र या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग अशी मान्यता झाल्यामुळे सदर ताबा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित विभागाकडे देण्यात आलेला आहे. तेव्हापासून याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे .यामुळे या कामाला त्वरित गती देऊन ताबडतोब रस्ता पूर्ण करावा अशा प्रकारची मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.