अपघाताचा धोका कायम
प्रतिनिधी / वाळपई
गोवा कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला भागातून जाणारा रस्ता गोवा कर्नाटक सिमेवर धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले संरक्षक कठडे कोसळल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही धोकादायक परिस्थिती असताना राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. याची दुरुस्ती त्वरित हाती घ्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे. सुमारे नऊ कोटी खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले असले तरीसुद्धा सदर रस्त्याचे डांबरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही?. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या रस्त्याचे डांबरीकरण शक्मय तेवढय़ा लवकर पूर्ण करण्यासाठी महामार्ग व्यवस्थापनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
वळणांवर स्थिती धोकादायक
केरी ते गोवा हद्दीपर्यंत या रस्त्याच्या देखभालीकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा प्रवासी वर्गाचा आरोप आहे. गोवा कर्नाटक दरम्यानच्या सीमेवरील एका ठिकाणी धोकादायक वळणावर रस्त्याच्या बाजूला असलेले संरक्षक कठडे कोसळलेल आहेत. यामुळे धोका निर्माण झालेला आहे. बेळगाव भागातून गोव्यात येणाऱया वाहनांसाठी हा मोठा धोका आहे. वळणावर रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनाने रस्ता सोडल्यास गंभीर अपघात घडण्याची शक्मयता आहे. यामुळे या ठिकाणी ताबडतोब संरक्षक कठडे उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
दरडी अजूनही धोकादायक
आणखी दोन महिन्यांनी पावसाला सुरुवात होणार आहे. गेल्यावषी तीन वेळा रस्त्याच्या बाजूच्या दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने घडला. याची दखल घेऊन निदान यंदातरी याठिकाणी उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यास प्रवाशांना जंगलभागात ताटकळत राहावे लागते. याची दखल घेऊन या ठिकाणी कोसळणाऱया दरडी यासंदर्भात उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.