मिरज तालुक्यात पथकांची स्थापना, ग्रामीण पोलिसांच्या गावांना भेटी
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्याच्या विविध गावांमध्ये वाढत्या चोऱ्याचे प्रमाण चिंताजनक असल्याने ग्रामीण पोलिसांनी आता ऍक्शन फ्लॅन तयार केला आहे. गावागावातील वाडय़ा – वस्त्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
ही पथके गावात येणाऱ्या संशयीत व्यक्तींवर पाळत ठेवून पोलिस प्रशासनाला सतर्क करणार आहे. तसेच ग्रामीण पोलिसांच्या सहाय्याने विविध ठिकाणी गस्तीही घालणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात होणाऱया चोऱ्या रोखण्यास मदत होणार आहे.