अधिकाऱयांना जिल्हाधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या विस्तारीकरणाचे काम वेळेत पूर्ण करावे. कोणत्याही प्रकारची सबब सांगून काम पूर्ण करण्यास विलंब होता कामा नये तसेच कामे करताना नागरीकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. स्मार्ट रस्त्यावर जलवाहिन्या घालताना नुकसान होणार नाही याकडे लक्ष पुरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांना बजावला.
चोविस तास पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणासाठी सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयानी विविध विभागाच्या प्रमुखांसह एल. ऍण्ड टी कंपनीचे प्रतिनिधी आणि पायाभूत सुविधा खात्याच्या अधिकाऱयांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींना विविध सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या. विकासकामे राबविताना विविध खात्यांतर्गत परवानगी मिळत नाही. तसेच समन्वयाच्या अभावामुळे विकास कामे रखडण्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या चूका होऊ नयेत याची दक्षता संबंधीत खात्याच्या अधिकाऱयांनी घ्यावी. पाणीपुरवठा योजनेचा विस्तार 48 वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे जलवाहिन्या घालताना हेस्कॉम, पाणीपुरवठा मंडळ, महापालिका, स्मार्ट सिटी, कॅन्टोन्मेंट, बुडा, केआयडीबी. अशा विविध विभागाचे सहकार्य आवश्यक आहे. काहीवेळा ठराविक विभागाकडुन सहकार्य मिळाले नसल्याने कामे रखडतात. त्यामुळे सर्व खात्याच्या अधिकाऱयांनी समन्वय राखून चोविसतास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली.
चोविस तास पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणाचे कंत्राट एल. ऍण्ड टी कंपनीला मंजुर झाले आहे. याकरीता पहिल्या सहा महिन्यात सर्व्हेक्षण करून आराखडा तयार करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील साडेचार वर्षात योजनेची अंमलबजावणी करून नळ जोडणी देण्याची अट घालण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सात वर्षे देखभालीची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीकडे असणार आहे. अशी विविध माहिती जिल्हाधिकाऱयांना पायाभूत सुविधा खात्याच्या अधिकाऱयांनी व एल ऍण्ड टी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादर केली.
विलंब झाल्यास कारवाई
देण्यात आलेल्या अवधीत योजनेचे काम पूर्ण करावे. कोणतेही सबब देवुन काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जलवाहिन्या घालताना अडचण निर्माण होण्याची शक्मयता आहे. पण स्मार्ट सिटी कंपनीने काही ठिकाणी जलवाहिन्या घालून ठेवल्या आहेत. काँक्रिट केलेलया रस्त्याचे नुकसान होऊनये याकरिता जलवाहिन्या घालण्यासाठी रस्त्याशेजारी पेव्हर्स ब्लॉक घालण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट रस्त्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. तसेच कामाचा दर्जा राखून नागरिकांची गैरसोय होणार नाही. याकडेही सर्व विभागाच्या अधिकाऱयांनी लक्ष द्यावे असा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला.
या बैठकीला एल. ऍण्ड टी कंपनीचे शशिकुमार, हार्दिक देसाई, महापालिका आयुक्त जगदीश के. एच. पायाभूत सुविधा खात्याचे कार्यकारी अभियंते सुब्रमण्याम, सहाय्यक कार्यकारी अभियंते उमेश निट्टूरकर, स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशिधर कुरेर, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंते एल. चंद्राप्पा, हेस्कॉम, केआयडीबी, कॅन्टोमेंट अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.