वार्ताहर / आंबोली:
चौकुळ-नेनेवाडी येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबराच्या पिल्लाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडून येथील ग्रामस्थांनी जीवदान देत वन कर्मचाऱयांच्या ताब्यात दिले.
चौकुळ नेनेवाडीजवळच दोन किलोमीटर अंतरावर जंगलातून सांबराच्या पिल्लाचा पाठलाग करून कुत्र्यांनी त्याला रस्त्याशेजारील उसाच्या मळय़ात आणले. यावेळी तेथे कामानिमित्त असणारे नेनेवाडीतील ग्रामस्थ अनिल परब आणि त्यांच्या सहकाऱयांनी या पिल्लाला त्या कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून वनविभागाला कळविले. यावेळी वनरक्षक गोरख भिंगारदिवे, अमोल पटेकर, वनमजूर शिवा गावडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या जखमी पिल्लाला आणले. पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी प्राथमिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.