ऑगस्ट, 2020 पासून उद्योग 4.0 आणि कृषी-4.0 तंत्रज्ञानाची चर्चा रंगात आली आहे. विशेषतः वर्ल्ड गव्हर्न्मेंट समिट-2018 नंतर कृषी-4.0 ची चर्चा वेगाने होत आहे. पण शेतकऱयांपर्यंत पोचायला आणि पोचवायला किती वेळ लागणार माहीत नाही. कृषी आणि औद्योगिक मंत्रालयांनी धोरणात्मकदृष्टय़ा या क्रांतीकडे पाहिले पाहिजे. भविष्यातील कृषी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेती क्षेत्रामध्ये अचूक निदान शक्मय होणार आहे. कमी खर्चाची आणि अधिक उत्पादनाची गरज सध्या निर्माण झाली आहे.
कृषि क्रांतीच्या आघातामुळे जनसंख्या आणि त्यांची अभिरुची, आरोग्य आणि अनुपालन, नैसर्गिक संसाधनाची दुर्मीळता आणि त्यांच्या वापरातील अकार्यक्षमता, हवामान अस्थिरता आणि अन्नाची नासाडी या चार प्रमुख बाबींविषयी संशोधन आणि विकास यावर जोर दिला जाणार आहे.
कृषी क्षेत्रातील बदलास प्रारंभ
सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी कृषी क्षेत्रातील बदलास प्रारंभ झाला. त्यानंतर हरित क्रांती, माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा तीन टप्प्यानंतर आता चौथ्या टप्प्यातील ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आय.ओ.टी.) आणि मोठय़ा प्रमाणातील उपलब्ध होणाऱया माहितीचे (आकडेवारीचे) विश्लेषण व नियंत्रण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व नॅनो तंत्रज्ञानाची अनेक उपकरणे निर्माण होत आहेत. या सर्वांची एकात्मिक कृती कृषी क्षेत्राला सांभाळणार आहे. या तंत्रज्ञानाचा अधिक वापर युवक करू शकतो. म्हणून संपूर्ण शेती क्षेत्र युवकांसाठी राखून ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. विशेषतः ‘बिग डेटा’ उपलब्ध होणे आणि त्याचे विश्लेषण करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) निर्माण होणे आणि त्यावर नियंत्रण मिळविणे हे युवकांना शक्मय होणार आहे. यामुळे अचूक निदानाची शेती शक्मय होणार आहे. अशा पद्धतीची माहिती मिळवून कृषी व्यवहारामध्ये बदल केले जात आहेत. ‘बिग डेटा फॉर बिग फार्मिंग’ हे कृषी-4.0 चे सूत्र आहे.
व्यावहारिक उपयोग महत्त्वाचा
मृद आरोग्य व सामू नियंत्रण, पिकातील सत्त्व व स्वाद गुण नियंत्रण, बदलती बियाणे व खतांचे नियंत्रण, लिव्ह इन लाईन गुणधर्माचे नमुने, पीक संरक्षणातील बौद्धिक गुणधर्म, बिग डेटाचे विश्लेषण करणारी यंत्रणा आणि मागणीप्रणीत उत्पादन व विपणन कौशल्ये विकसित करून ते कृषी-व्यवहार सुलभ करण्याचा प्रयत्न म्हणजेच कृषी-4.0 तंत्रज्ञान आहे. यासाठी आय.ओ.टी. सेन्सॉरचा व्यावहारिक उपयोग महत्त्वाचा असतो. गार्टनर यांच्या पाहणीनुसार सध्या 20.5 अब्ज कनेक्टिंग डिव्हायसेस उपलब्ध आहेत. त्याचे प्रमाण 4 ला 1 असे आहे. सध्याच्या मोबाईलपेक्षा अधिक माहिती साठविण्याचे आणि त्याचे विश्लेषण करण्याची अनेक उपकरणे उपलब्ध होणार आहेत.
मृद आरोग्याचा तपशील, हवामान, आर्द्रता, पाऊसमान, तपमान, पाणी, पीक व खतांचे नियंत्रण करून दररोज शेतीला अन् पिकाला काय हवे आहे, ते सांगणारे संगणक लवकरच भारतीय बाजारात येतील. त्यावर आधारित विक्री, वाहतूक, गुणवत्ता आणि उपभोगासंबंधीची माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण क्षणात उपलब्ध होईल, अशी शक्ती या तंत्रज्ञानात उपलब्ध आहे. भविष्यातील बऱयाच गोष्टींचा अंदाज पीक पेरणीच्यावेळी लक्षात येणार आहे. दूध धंद्यामध्ये या तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होणार आहे. दुधाळ जनावराचे आरोग्य, दुधाची गुणवत्ता, भविष्यातील समस्यांची माहिती उपलब्ध करून देणारे हे तंत्रज्ञान आहे. अशा ताकदीच्या उपकरणासमोरून गाय/म्हैस गेली की त्यांच्या भविष्यातील आरोग्य, त्यांच्या दुधाची गुणवत्ता सहज उपलब्ध होते. दुधाचे विघटन-विश्लेषणदेखील मिळते. हे सर्व आय.ओ.टी. तंत्रज्ञानाने (बिग डेटा+कृत्रिम बुद्धिमत्तेचा संयोग) उपलब्ध होणार आहे. आय.ओ.टी.ने तयार केलेले सध्याचे मूल्य 14.4 ट्रिलियन डॉलर इतके आहे.
ड्रोनसारख्या उपकरणाद्वारे पिकांना कोणत्या खताची आणि किती पाण्याची गरज आहे अथवा ओव्हरडोसचे प्रमाण काय आहे, याचे विश्लेषण होऊ शकते. ट्रकमध्ये भरलेल्या मालाची गुणवत्ता कुठेही बसून तपासता येते. अथवा त्याची माहिती शेतकऱयांना व व्यापाऱयांनाही होऊ शकते. स्काऊट ड्रोनच्या साहाय्याने ‘अप ईन स्काय’ तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकते. पिकावरील रोगाचे निदान व त्यावर उपाय स्काऊटिंग ड्रोन सांगू शकते. रोबोच्या वापरामुळे ते आणखी अचूक होते व त्याची कृतीदेखील केली जाते.
कृषी उत्पादनात वाढ
अचूक निदानाच्या शेती तंत्रज्ञानामुळे 2018 साली 5.09 अब्ज डॉलरचे कृषी उत्पादन वाढले. ते 2023 पर्यंत 9.53 अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. हायड्रोपॉनिक तंत्राप्रमाणे हायड्रोकल्चर शेती शक्मय झालेली आहे. मातीविना शेती त्यामुळे शक्मय झालेली आहे. पाण्यामध्येच हवे ते सर्व घटक द्रवरूपाने सोडून शेती कसता येते. ऑस्ट्रेलियातील सनड्रॉप कंपनीने अशा पद्धतीच्या शेतीची सुरुवात केली आहे. अल्गीचा वापर खत म्हणून केला जातो. तसेच सी-विडचा वापर खत म्हणून होतो. सी-वॉटर फार्मिंग, डेझर्ट ऍग्रीकल्चर, उर्ध्व अथवा शहरी शेती, अचूक निदानाची शेती, ब्लॉकचेन क्राऊड फार्मिंग, नॅनो ऍग्रीकल्चर अशा अनेक तंत्राने शेती कसण्याची बौद्धिक चाचणी जगभर होत आहे. हे सर्व भारतात पोचायला वेळ लागेल किंवा हे तंत्रज्ञान आम्हाला नको म्हणणाऱयांची संख्या भारतात जास्त आहे. कारण हे तंत्रज्ञान भारतातल्या शेतकऱयांच्या बुद्धीच्या पलीकडची बाब आहे. कारण शिकता आले नाही म्हणून शेतीत आलेल्या युवकांचा भरणा जास्त असल्याने हे तंत्रज्ञान भारतात येणारदेखील नाही. पण काही खासगी कंपन्यांनी मात्र अशा पद्धतीची शेती करायला सुरुवात केलेली आहे. सरकारची भूमिका सकारात्मक असल्यास अशी नाविन्ये शेती क्षेत्रामध्ये येऊ शकतात. पण सबसिडीवर जगणाऱया शेतकऱयांना मात्र हे तंत्रज्ञान पचणार नाही.
डॉ. वसंतराव जुगळे ः9422040684