हलगा-मच्छे बायपास रस्त्याला विरोध कायम, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला सुरूवात करण्यात आली असून, जोवर आम्हाला न्याय मिळणार नाही तोवर हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. रविवारी चौथ्या दिवशी देखील येळ्ळूररोड शेजारी शेतकऱयांनी आंदोलन केले. वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव परिसरातील शेतकऱयांनी महिला व लहान मुलांसह आंदोलन केले.
पोलीस बंदोबस्तात हलगा-मच्छे बायपासच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. उभ्या पिकावर जेसीबी फिरवत रस्ता करण्यात येत आहे. शेतकऱयांचा कोणताही विचार न करता त्यांच्यावर दडपशाही करत रस्ता केला जात असल्याने या विरोधात शेतकरी उभे ठाकले आहेत. चौथ्या दिवशी देखील बायपास शेजारी आंदोलन करत शेतकऱयांनी आपला विरोध दर्शवून दिला. यावेळी राजू मरवे, भोमेश बिर्जे, मारूती बिर्जे, भैरू कंग्राळकर, मनोहर कंग्राळकर, नितीन पैलवानाचे, भैया होसूरकर, सुरेश मायाक्काचे, राजेंद्र देसाई, हणमंत कंग्राळकर, ओमकार कंग्राळकर, आदित्य कंग्राळकर, विनायक हलगेकर, जतीन बिर्जे, सुभाष चौगुले, महेश चतूर, हणमंत बाळेकुंद्री, परशराम सनदी, राजू काकतकर, शांताराम होसूरकर, विठ्ठल बाळेकुंद्री, सोमनाथ चतूर, आप्पासाहेब देसाई, लक्ष्मण देमजी, गुंडू भागाण्णाचे, नितीन पोटे, अमोल देसाई, सविता बिर्जे, निलम बिर्जे, अक्षता हलगेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.