वृत्तसंस्था / मुंबई :
चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स 420 अंकानी वधारला आहे. ही कामगिरी करण्यासाठी देशातील प्रमुख आयटी कंपनीच्या समभागातील तेजीच्या जोरावर शेअर बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. तर दुसऱया बाजूला मात्र कोविडचा वाढता संसर्गामुळे जागतिक बाजारामधील विक्री दबावात राहिली आहे.
दिवसभरात चढउताराच्या वातावरणासोबत सुरु असणाऱया शेअर बाजाराचा प्रवास दिवसअखेर 419.87 अंकानी वधारुन निर्देशांक 36,471.68 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 121.75 अंकानी वधारुन निर्देशांक 10,739.95 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये देशातील आयटी कंपनी इन्फोसिसला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा मिळण्याच्या संकेतामुळे समभाग तेजीत राहिले होते. याचाच परिणाम म्हणून आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत इन्फोसिसला निक्वळ नफा 12.4 टक्क्मयांनी वधारुन 4,272 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. यामुळेच गुरुवारी कंपनीचे समभाग तब्बल 10 टक्क्यांनी वधारले आहेत.
दिवसभरात अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, कोटक बँक, एचसीएल टेक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग लाभात राहिले होते. तर टेक महिंद्रा, आयटीसी, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, टायटन आणि ओएनजीसीचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील घडामोडी पाहिल्यास चीनच्या बाजारात झालेली विक्री आणि कोविडचे वाढते प्रमाण यामुळे बाजारात चढउतार राहिले आहे. शांघाय, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजार मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.