अवधुतांचा पुढील गुरु हत्ती होय. त्याबद्दल ते म्हणाले, ‘स्त्रियांच्या आकर्षणाने मोठमोठय़ा शक्तिशाली व्यक्तीसुद्धा नाश पावतात. ज्याला आत्मसुखाची इच्छा आहे, त्याने स्त्रियांचा संसर्ग ठेवू नये. हत्तींणीच्या आकर्षणाने शक्तिशाली हत्तींची झुंज होते. योग्याने कधीही स्त्रीविषयी आसक्ती धरू नये. योगीच काय देव, मनुष्य आणि पशु या सर्वांचा नाश स्त्रीच्या आसक्तीमुळे झाल्याची कित्येक उदाहरणे देता येतील.
स्त्री आणि सोने यांची आसक्ती ज्याला असेल त्याला भवरोगाने ग्रासले म्हणून समज. तेव्हा या दोन्ही गोष्टी ज्याला मनापासून आवडत नाहीत तोच या जगातील जनार्दन आहे असे समज. म्हणून ज्याला संन्यस्त जीवन जगायचे आहे त्याने स्त्रिया पहिल्या की, त्यांच्याकडे पाहू नये, त्यांच्याशी बोलू नये उलटपक्षी तिथून शक्मय तेवढय़ा वेगाने पळून जावे. गंमत म्हणजे पायाखाली काटकीसारखी एखादी निर्जीव स्त्रीलिंगी वस्तू जरी आली तर तीसुद्धा पायाला टोचून छळ करायचे सोडत नाही. आता बघ अनिरुद्धाने स्वप्नात उशेला बघितले तर चित्ररेखेने त्याला पळवून नेले. बाणासुराने बांधून ठेवले. त्याला सोडवायला कृष्ण धावला पण कामारी म्हणजे शिव बाणासुरावर प्रसन्न असल्याने कृष्ण आणि शंकर यांच्यात बाणासुरावरून घनघोर युद्ध झाले. थोडक्मयात काय, तर स्वप्नात बघितलेल्या स्त्रीपायी देवाधिदेव शिव आणि महापराक्रमी कृष्ण यांच्यात युद्ध लागले.
स्वप्नांतल्या स्त्रीमुळे बांधल्या गेलेल्या अनिरुद्धाची, सुटका करण्याच्या प्रयत्नात हरिहर भिडले पण त्याची सुटका काही झाली नाही. हे लक्षात घेतले तर इतरांची काय कथा होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
इकडे अनिरुद्धाची काय अवस्था झाली पहा. अनिरुद्ध म्हणजे अजेय पण उषेचा हात धरल्यावर तोही पराभूत झाला. स्वतःला पुरुष म्हणतात आणि स्त्रियांचे पाय धरतात मग त्यांना मुक्ती कशी मिळेल? तेव्हा यदुराजा स्त्रीसंगतीने अधःपतन निश्चित आहे हे लक्षात ठेव. इंद्राची विटंबना अहल्येच्या नादाला लागून झाली. भस्मासुराचीही तीच कथा! तिलोत्तमेला पाहून सुंद उपसुंद आपण सख्खे भाऊ आहोत हे विसरून आपापसात झगडू लागले. परिणाम काय झाला?
तिलोत्तमा तर मिळाली नाहीच उलट दोघांनी एकमेकांचे प्राण घेतले. तात्पर्य, देव काय, मनुष्य काय, किंवा पशु काय, या सर्वांच्या नाशाला स्त्री संगत कारणीभूत होते. तिच्याच संगतीने गृहाबद्दल आसक्ती उत्पन्न होते. कलहाचे कारणही स्त्रीच असते.
देव असो वा मनुष्य दोघांचाही स्त्रीच्या संगतीने नाश होतो. हे योग्याने पक्के ध्यानात ठेवावे. वेश्येच्या नादाला जे लागतात त्यांचा सर्वनाश अटळ असतो. स्वपत्नी बरोबर सतत कामाराधना करण्यात भय नाही असे वाटत असेल तर तेही चुकीचे आहे. कारण त्यामुळे मनुष्य उन्मत्त होतो. क्वचित जरी स्त्रीसंग झाला तरी तो नरकात टाकतो मग उद्धार कुठून होणार असे माणसांच्यातच घडते असे नाही तर हत्तींच्या विश्वात हेच घडते. हत्तीणींसाठी मोठमोठे बलदंड हत्ती एकमेकांच्या जीवावर उठतात.
गजराज हत्तीणींमध्ये क्रीडा करीत असता त्यावर दुसरे बलिष्ट हत्ती चालून येऊन युद्ध करतात आणि आपल्या अंगबळाने त्यास ठार करतात. जो विजयी होतो तो त्या हत्तीणींचा उपभोग घेतो. एकूण काय माणूस असो वा प्राणी स्त्रीमुळे सर्वनाश होतो हे नक्की. अवधूत यदुराजाला योग्याने सर्वगुणसंपन्न होण्यासाठी कुणकुणाकडून कोणकोणते गुण घ्यावेत व कोणकोणते दुर्गुण त्यागावेत यादृष्टीने त्यांनी केलेल्या चोवीस गुरुंची माहिती देत आहेत. आत्तापर्यंत आपण त्यातील चौदा गुरुंची माहिती घेतली.
योग्याने स्त्रियांपासून निक्षून दूर का रहावे हे अवधुतानी सांगितले. सर्वसामान्य गृहस्थाश्रमी पुरुषाने यातून शिकायचे म्हणजे परस्त्रीचा चुकूनही नाद करायचा नाही. परस्त्री वि÷sसमान माना असे श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. तसेच स्वस्त्रीचा उपभोग मर्यादित प्रमाणात घ्यावा अतिरेक करू नये अतिरेक केल्यास मनुष्य गर्वि÷ आणि मस्तवाल होतो.
क्रमशः