कॉमनसेन्स खरच कळत नाही : त्यात अभ्यास करण्यासारखं काय आहे? : महिला अत्याचाराच्या घटनांवरून कायदे कडक करण्याची : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही साधला निशाणा
प्रतिनिधी / सातारा
मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे.इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे हेच आम्ही सांगतो आहे.ज्याना हवं आहे ते द्याना कशाला हवा आहे अभ्यास अशा शब्दात टिप्पणी करत खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणावर त्यांचा गाढा अभ्यास आहे हे आम्ही मान्य करतो. मात्र ते वयाने मोठे आहेत. म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी सणसणीत चपराक लगावली.दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.महिला अत्याचाराच्या प्रश्नी कायदे कडक करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
जलमंदिर पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले,मला माहिती नाही ते काय बोलले आरक्षणाबाबत पण माझा अभ्यास कमी जरी असला तरी कॉमन्सेन्स आहे.मला खरच कळत नाही कॉमन्सेस ह्यांना किती आहे ते.इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजला आरक्षण मिळालं पाहिजे.अशी मागणी मराठा समाजाची आहे. त्यात अभ्यास करण्यासारखं काय आहे, ज्यांना अभ्यास करायचा होता.त्यांनी का ठेवलं वंचित.याच उत्तर द्यावे,त्यांनी असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी उपस्थित केला.पुढे ते म्हणाले, द्याना कोणाला पाहिजे ते यात अभ्यासाचा प्रश्न येतो कुठे?मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे, यात अभ्यास काय करायचा? ज्यांना अभ्यास करायला हवा होता. त्यांनी माझी बुद्धी काढली. त्या तज्ञ लोकांनी याचं उत्तर द्यावं. माझा अभ्यास जर असता तर अनेकांनी केलं तसं मला पण करता आलं असतं, असा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही डागल टीकास्त्र
येत्या चार महिन्यांत भाजपचे आमदार फुटणार असा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही उदयनराजे बरसले. राजकारणात फाटाफुटी दररोज होत राहतात. फूट कशात पडणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही. काय होईल काय नाही देवाला माहीत. पण त्यांनी सरकार चांगल टिकवलं म्हणजे झालं, अशी मिश्कील टिप्पणीही अजित पवार यांच्यावर केली.
महिला अत्याचाराच्या प्रश्नी कायदे कडक करण्याची भूमिका
राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत असा प्रश्न केला असता उदयनराजे म्हणाले, कोणाच्या ही बाबतीत तसे घडू नये, दुर्दैव.कडक कायदे व्हावेत यासाठी आम्ही कित्येक वेळा बोलतो.ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांची तक्रार घेतली जात नाही मात्र ज्यांनी अन्याय केला आहे त्यांच्या तक्रार घेतली जाते.मी तर कित्येक वेळा पोलीस स्टेशनला जाऊन दमलो,अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.