टोप / वार्ताहर
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास पाच हजार टन ऊस गाळप क्षमतेची परवानगी मिळाली आहे. त्याचे काम या हंगामानंतर सुरु होईल, अशी माहिती कारखान्याचे संचालक व माजी आमदार अमल महाडिक यांनी टोप येथे दिली. ते टोप येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाराम सोसायटीचे चेअरमन भगवान पाटील हे होते.
माजी आमदार अमल महाडीक यांनी आज टोप व दक्षिण वाडी येथील विविध शेतकऱ्यांना भेटून अडीअडचणी जाणून घेतल्या. महाडिक पुढे म्हणाले, कारखान्याचा कारभार पारदर्शक असुन विरोधकांनी चांगल्या कामाला विरोध करु नये. विरोधकांना सहकार मोडित काढुन खाजगीकरण करायचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस उत्पादन वाढीसाठीचे उपक्रम छत्रपती राजाराम कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक माहिती संकलित केलेले पुस्तक ऊस उत्पादक सभासदांना देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती राजाराम कारखाना निविन अॅपची निर्मिती करून त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे, अशीही माहिती दिली.
यावेळी संभाजी महाडिक, अरुण गायकवाड, कल्लेश्र्वर मुळीक, विठ्ठल पाटील, एस. एम. पाटील, आनंदराव पाटील बाबासो पाटील, नागेश पाटील, दिलीप पाटील, राजाराम पाटील, शिवाजी चौगुले, विश्वास पाटील, उदय गायकवाड, अरुण पाटील, बाजीराव तावडे, संतोष पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह छ. राजाराम विकास सोसायटी, दत्त विकास सोसायटी, वसंत विकास सोसायटिचे संचालक मंडळ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विजयसिंह पाटील यांनी मानले.