वाळपपई शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती उत्सव
प्रतिनिधी /वाळपई
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी आयोजन समितीतर्फे वेगवेगळय़ा प्रकारचे उपक्रम आयोजित होणे आज गरज बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्व प्रत्येक तरुणासाठी ऊर्जास्त्राsत निर्माण करणारे असल्याचे प्रतिपादन सत्तरी गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांनी केले आहे .शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
वाळपई नगर पालिका छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयोजन समितीच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्याच्या उपक्रमाचे स्वागत केले व अशा प्रकारचा आदर्श इतर समित्यांनी करावा अशा प्रकारचे आवाहन यावेळी त्यांनी केले .
शिवजयंती आयोजन समितीतर्फे दर महिन्याला वेगवेगळय़ा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात .त्याचप्रमाणे शिवप्रति÷ान या संस्थेतर्फे दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात येत असते असे समितीचे उपाध्यक्ष उदयसिंग राणे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण प्रत्येकाने करावे असे आवाहन समितीचे सचिव प्रसाद खाडिलकर यांनी केले. समितीचे सक्रिय कार्यकर्ते प्रदीप गंवडळकर यांनी यावेळी आयोजन समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱया प्रत्येक उपक्रमांची सविस्तरपणे माहिती दिली.
याप्रसंगी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते ओंकार परब यांनी आयोजन समिती करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
समितीचे कार्यकर्ते उदय सावंत यांनी एकूण सविस्तरपणे कार्यक्रमाचा आढावा घेतला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा सत्तरी तालुक्मयातील तरुणांच्या मनापर्यंत निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱया काळात विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सुभाषचंद्र गावस यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजासाठी कशा प्रकारे प्रेरक ठरू शकतात या संदर्भात विचार मांडले. सूत्रसंचालन मिलिंद गाडगीळ यांनी केले तर शेवटी उदय सावंत यांनी आभार मानले.