बेळगाव प्रतिनिधी
पावसाळा सुरु होण्याआधी छत्री रेनकोट आणि ताडपत्री विकणाऱया व्यापाऱयांचा हंगाम फक्त 2 ते 3 महिने असतोच. मात्र सध्या लॉकडाऊन असल्याने व्यापाऱयांच्या या सीजनवर पाणी फिरले आहे. लॉकडाऊन मुळे आणि शाळा, कॉलेज बंद असल्याने छत्री रेनकोट यांच्या मागणीत घट झालेली दिसून येत आहे.तसेच पुरेसा माल नसल्याने येणाऱया काळात छत्री रेनकोटची आवक वाढणार असून दर ही वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
यंदा पावसाळय़ाला लवकर सुरुवात झाली आहे. त्यात लॉकडाऊन असल्याने सर्व दुकाने बंद आहेत. ठराविक वेळेत दुकाने उघडण्याची मुभा असल्याने नागरिक छत्री, रेनकोटच्या, ताडपत्रीची खरेदी करत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या आदी पावसाळय़ाचे पुरेसे साहित्य खरेदी केले नसल्याने नागरिकांना दुकानातून माघारी परतावे लागत आहे.कोरोनाविषाणूचा प्रसार पुन्हा वाढल्याने एप्रिल महिन्यातच लॉक डाऊन करण्यात आले. त्यानंतर जवळपास जूनचा तिसरा आठवडा येऊन देखील लॉकडाउन तसाच असल्याने छत्री, रेनकोट व्यवसायिकांना समस्या निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
सतत संततधार पडत असलेल्या पावसाने अनेकांना रेनकोट छत्री मिळत नसल्याने आहे त्या परिस्थिती समाधान मानावे लागत आहे . तसेच येणाऱया पुढील अनलॉकच्या काळात छत्री, रेनकोट व्यवसायांकडे गर्दी होणार असून दरही वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच यंदा शैक्षणिक वर्ष बंद असल्याने यांचा फटका व्यवसायिकांना बसणार आहे.