ऑनलाईन टीम / मुंबई :
आज वर्धा जिह्यात एका मुलीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केलाय.
याबाबत योग्य पावले उचलत युवा पिढीला नवी दिशा हे सरकार दाखवेल व जनतेला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार पुन्हा मिळवून देईल, महाराष्ट्रातून देशाला एक आदर्श संदेश जाईल की महिला या आपल्या मुली, आई, बहिणी आहेत व हे काम महाराष्ट्र नक्कीच करेल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय.
त्या म्हणाल्या, मागच्या वेळी आघाडी सरकार असताना तत्कालीन मंत्री राजेश टोपे यांनी छेडछाड मुक्त महाराष्ट्र असा कार्यक्रम राबवला होता. हा कार्यक्रम पुन्हा राबवण्याची गरज असल्याचे मतही खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱया अशा घटनांना आळा बसण्यासाठी अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षाच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.